शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणीतील शेतकऱ्यांचा रिलायन्स विमा कंपनीविरुद्ध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:54 PM

सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले.

परभणी : सोयाबीन पीक विमा प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज  काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांच्या संघर्ष समितीच्या वतीने आज दुपारी १ वाजता शनिवार बाजार येथील मैदानातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान विमा कंपनीबरोबरच सत्ताधारी शासनाविरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. 

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे. कंपनीने जिल्ह्यातून सोयाबीनच्या विमा हप्त्यापोटी १७३ कोटी रुपये वसूल केले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असतानाही कंपनीने नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत कंपनीच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोयाबीन विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये व सोयाबीन पीक विमा भरपाई द्यावी. 

कापूस, तूर, मूग या पिकांसाठीही विमा भरपाई द्यावी, बोंडअळीचे अनुदान हेक्टरी ४० हजार रुपये अदा करावे, जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध करावा, दुष्काळ जाहीर करण्याचे नवीन निकष रद्द करावेत, कृषीपंपासाठी मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करावा आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन क्षीरसागर व माणिक कदम यांच्य नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMorchaमोर्चाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी