शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परभणी : उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:45 IST

सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरासरी १४ हजार रुपयांचा खर्च झाला असून, त्या तुलनेत प्रति एकरी १८ हजार रुपयांचे उत्पादन होत असल्याने शेतकºयांना केवळ ४ ते ५ हजार रुपये हातात पडत आहेत. पेरणीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे़मानवत तालुक्यातील शेतशिवारात सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे़ दसरा सणाच्या आगोदर सोयाबीनची काढणी करून त्याच शेतात रबी हंगामातील पेरणीसाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे़ मात्र मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असल्याने शेती करताना अडचणी निर्माण होत आहेत़ सोयाबीन काढणीसाठी एकरी १५ हजार रुपयाचा खर्च येत आहे़ दुसरीकडे शासनाकडून शेतकºयांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी निकषाचे ओझे शेतकºयांच्या खांद्यावर टाकले जात आहे़ आपला माल विक्री केल्यानंतरही चुकाºयासाठी तीन-तीन महिने शेतकºयांना ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतकºयांच्या पाठीशी आहे़ एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकी नऊ आलेल्या शेतकºयांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापाºयांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे़ यामुळे शेतकºयांची अवस्था मागे आड पुढे विहीर अशी झाली आहे़ अनेक शेतकºयांनीशासनाच्या जाचक अटींमध्ये अडकायला नको म्हणून खाजगी व्यापाºयांकडे आपला माल खाली केला आहे़ दहा वर्षांपासूनाचा शेती व्यवसाय आणि त्यापासून निघणाºया उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे़ शेतीसाठी लागणारी अवजारे, निविष्ठा यांचा खर्च दुप्पटीने वाढत असून, शेतीमालाचा भाव घटला आहे़ तालुक्यातील सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़एक हजार शेतकºयांची : आॅनलाईन नोंदणीराज्य शासनाने सोयाबीनला हमीभाव ३ हजार ३९९ रुपये जाहीर केला आहे़ हमीभाव केंद्रावर माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केली, असून, नोंदणीचा एक हजाराचा आकडा पार झाला आहे़ मात्र प्रत्यक्षात या केंद्रावर खरेदी कधी सुरू होणार याची शाश्वती नसल्याने गरजेपोटी शेतकºयांना मिळेल त्या दराने खाजगी व्यापाºयांना सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे़२००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खर्च येत आहे़ उत्पन्न निम्म्यावर आले आहे़ शेतकºयांना आर्थिक फटका बसू नये म्हणून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे़दहा वर्षांतील सोयाबीनच्या भावातील फरकवर्ष हमीभाव प्रत्यक्ष बाजार भाव२००८-०९ १३९० १८०० ते २६००२००९-१० १३१० २००० ते २७००२०१०-११ १४४० २१०० ते २८००२०११-१२ १६९० २४०० ते ५०००२०१२-१३ २२४० २३०० ते २५००२०१३-१४ २५६० २४५० ते ३७००२०१४-१५ २५६० २४०० ते ३३००२०१५-१६ २६०० १८०० ते २८०००२०१६-१७ २७७५ १६०० ते २५००२०१७-१८ ३०५० १६०० ते २५००२०१८-१९ ३३९९ २७०० ते ३०००एकरी सोयाबीन उत्पादनासाठी येणारा खर्चशेती कामे वर्ष २००८ वर्ष २०१८नांगरणी २५० रु़ १५०० रु़रोटावेटर -- ३००बियाणे ६०० २२००पेरणी १०० १६००बीज प्रक्रिया ़़़़ ६००तननाशक १००० २५००बुरशीनाशक ४०० १०००फवारणी १०० ८००कापणी ५०० २०००काढणी ६० १२००मजुरी १०० ७००एकूण ३५६० १४४००

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणीRainपाऊस