शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

परभणी : पाण्याअभावी वृक्ष लागवड मोहिमेला बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:51 IST

वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.राज्य शासन गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षीच्या जून महिन्यात ३४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या वृक्षांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली.सध्या तर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या झाडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २२ विभागांनी लावलेल्या ३४ लाख झाडांपैकी बहुतांश रोपटे जळून गेली आहेत.शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज४ राज्य शासन दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवून वृक्ष लागवड करीत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते; परंतु, एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षाला पाणीपुरवठा केला जात नाही, तशी तरदूतही या योजनेत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील झाडे जगविण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ