शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:29 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तालुक्यातील शेतकरी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसावर शेतकºयांनी आर्थिक भार सहन करीत कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत पिकाला खत, फवारणी, निगराणी केल्याने पिकेही जोमदार वाढली; परंतु, कापसाचे पीक हातात यायच्या वेळेसच परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला. पावसाने नुकसान झाल्याने फुटलेल्या कापसाचे तीन तेरा वाजले. ज्या शेतकºयांच्या शेतात कापूस वेचणी बाकी आहे, ते शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. यंदा मजुरीने शेतकºयांचे कंबरडे मोडले असून सव्वाशे रुपये असलेला मजुरीचा दर दोनशे रुपयांवर गेला आहे. ७ ते १० रुपयाने किलोने कापसाची वेचणी केली जात आहे. परिणामी उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकºयांना वेचणीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना शेतात ने -आण करण्यासाठी शेतकºयाला वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ज्या शेतकºयांनी वेचणी पूर्ण करुन माल बाजारात विक्रीसाठी आणला आहे, त्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. एकूणच यंदा कापूस उत्पादक शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र तालुक्यासह परिसरात दिसून येत आहे.खर्च, उत्पादनाची: गोळाबेरीज जुळेना४कापसाच्या पिकाला केलेला खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. झालेल्या खर्चा एवढे उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. पाऊस, मजुरीचे वाढलेले दर व मिळत असलेला कमी भाव या तिहेरी संकटाने शेतकºयांना आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे.४कापूस उत्पादक शेतकºयांची अवस्था पाहाता त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.सोयाबीनची आवक घटली४या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सर्वच मालाची आवक घटली आहे.४ विशेषत: सोयाबीनची आवक गतवर्षी आॅक्टोबर अखेर ३० हजार क्विंटल झाली होती. या वर्षी यामध्ये घट झाली असून ११ नोव्हेंबरपर्यंत १९ हजार क्विंटल आवक बाजार समितीच्या यार्डात झाली आहे. या आकड्यावरुन आवक घटल्याचे दिसून येत आहे.२३ हजार हेक्टरवर कापूस४तालुक्यात एकूण ४२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात असून एकूण २३ हजार ७३३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्या खालोखाल १२ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूसRainपाऊस