शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:07 IST

विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़औरंगाबाद जिल्ह्यातून उगम पावलेली पूर्णा नदी विदर्भातून परभणी जिल्ह्यात प्रवेश करते़ या नदीवर विदर्भात खडकपूर्णा येथे आणि परभणी जिल्ह्यात येलदरी (ता़ जिंतूर) येथे धरण बांधले आहे़ पूर्णा नदीवर खडकपूर्णा धरणाची निर्मिती झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे़ मागील अनेक वर्षापासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ यावर्षी येलदरी प्रकल्पात केवळ ९९ दलघमी मृतसाठ्यात पाणीसाठा आहे़सध्या मराठवाड्यात पाऊस होत नसला तरी विदर्भामध्ये मात्र मुसळधार पाऊस होत आहे़ त्यामुळे विदर्भातील पावसाच्या पाण्याने येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र तीही धुळीस मिळाली आहे़ येलदरी धरणाचे पाणलोट क्षेत्र कन्नड, जाफ्राबाद, सिल्लोड, भोकरदन, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, देऊळगाव मही, तळणी, लोणार या भागात आहे़ मागील एक महिन्यापासून विदर्भामध्ये होत असलेला पाऊस हा काटेपूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असून, त्याचा लाभ कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणाला होत आहे़त्यामुळे येलदरी प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र विदर्भात असतानाही या प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही़२५ दलघमीची आवश्यकता४येलदरी धरणाची साठवण क्षमता ९३४ दलघमी असून, ८१० दलघमी उपयुक्त पाणीसाठवण क्षमता आहे़ धरणाच्या मृतसाठ्यात १२५ दलघमी पाणीसाठा होता़ प्रत्यक्षात ९९ दलघमी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे़४हे धरण मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी २५ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे़ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किमान १ हजार ते १२०० मिमी पाऊस झाला तर हे धरण भरू शकते़ सद्यस्थितीला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ ९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़खडकपूर्णाही मृतसाठ्यातचयेलदरी धरणाच्या वरील बाजुस बांधलेल्या खडकपूर्णा धरणाची पाणीसाठवण क्षमता १५९ दलघमी एवढी असनू, हे धरण अजूनही मृतसाठ्यात आहे़ खडकपूर्णा धरण भरल्यानंतरच येलदरी प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे़ हे धरण बांधल्यापासून म्हणजे २००९ पासून येलदरी धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, या धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसDamधरण