शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबीर :राजकारणातच काही पक्षांना रस- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:26 AM

मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे बुधवारी दुष्काळ निवारण संकल्प शिबीर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव, संयोजक आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ जयप्रकाश मुंदडा, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सोपान अवचार, नंदू पाटील, समप्रिया पाटील, अंबिका डहाळे, सखूबाई लटपटे, गजानन काकडे, ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना त्याला तोंड देण्यासाठी खंबीर आहे़ दुष्काळात जनतेला मदत करण्याचे काम पक्षाच्या आमदार, खासदारांकडून सुरू आहे़ त्यामध्ये सातत्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली़ शेतीमधलं मला काही कळत नसलं तरी शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र आपणाला कळतात़ त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्यास पक्षाचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले़ गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील पिकांची पाहणी करीत असताना आग लागून जळावीत तशी पिके दिसत आहेत़ ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करीत आहेत; परंतु, नोटाबंदीमुळे शहरातील उद्योगधंदेही बंद पडत आहेत़ अशा अवस्थेत शेतकºयांचे हाल होत आहेत़ त्याला सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी बोलताना संयोजक आ़ डॉ़ पाटील म्हणाले की, जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी ही १०० टक्के सौर उर्जेवर चालणार असून, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सूतगिरणी ठरणार आहे़ या सूतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे़ दुष्काळात शेतकºयांनी खचून न जाता व आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता कुटुंबाचा विचार करून संकटांचा सामना करावा, शिवसेना त्यांच्यासोबत आहे़, असे सांगून त्यांनी शिवसेनेची बांधिलकी शेतकरी व सर्वसामान्यांशी आहे़ पोलीस भरतीसाठी शिवसेनेने १०० युवकांना दत्तक घेतले असून, मेगा भरतीसाठी युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही शिवसेनेकडून सुरू असल्याचे ते म्हणाले़यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, विधायक कामे करण्यास शिवसेना कधीही मागे हटणार नाही़ सूतगिरणीचे भूमिपूजन हा त्याचाच एक भाग आहे़ जिल्ह्यातील जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी आहे़ त्यामुळे शिवसेनाही दुष्काळग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी बांधील आहे, असे सांगून त्यांनी आ़ डॉ़ पाटील यांच्या कामाचे कौतुक केले़शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्यांचे वाटपयावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नियोजित जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले़ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्यांचे वाटप करण्यात आले़ तसेच महिलांना शिलाई मशीन, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या १०० युवक, युवतींना साहित्याचे वाटप करण्यात आले़ तसेच जनावरांसाठी खाद्याचे वाटपही करण्यात आले़ यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ