शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणी: आचारसंहितेत दुष्काळी उपाययोजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:05 AM

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.२०१८ च्या खरीप हंगामात परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुके व २६८ महसूल मंडळांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुष्काळी भागामध्ये उपाययोजना लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर संभ्रमाचे वातावरण होते. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी भारत निवडणूक आयोगाने या उपाययोजना राबविण्यास काही नियमांच्या आधारे मंजुरी दिली आहे. त्यामध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ निकष लावून स्थानिक परिस्थिती व गरज लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु करण्यास मान्यता देण्यात यावी. त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्याची आवश्यकता राहणार नाही. दुष्काळी भागातील पाणीटंचाई विचारात घेऊन स्थानिक गरज व परिस्थिती पाहून टँकर सुरु करावेत. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी किंवा अशासकीय सदस्यांची मान्यता घेऊ नये. तसेच नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत स्थानिक परिस्थिती व गरज पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. मनरेगा योजनेंतर्गत रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन कामे घेता येतील. या सर्व बाबींसाठी पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींची मंजुरी घेण्याची गरज नाही, असेही या संदर्भात २२ मार्च रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव एस.एच.उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.४ जिल्ह्यात राणी सावरगाव येथील एका चारा छावणीचा अपवाद वगळता इतर ठिकाणी छावण्या सुरु झाल्या नाहीत. या आदेशामुळे चारा छावणी सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला तशी हालचाल सुरु करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकारElectionनिवडणूक