शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:36 IST

गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.मानवत तालुक्यातील मानोली ते परभणी तालुक्यातील नांदगाव या पट्ट्यामध्ये एकाही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. जायकवाडीचा कालवा असो अथवा निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा, या गावांच्या शेजारुन गेला; मात्र गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून दुष्काळाच्या झळा येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. या ६५ गावांच्या शिवारात प्रत्येक गावातील १ हजार हेक्टर जमीन अशी सुमारे ६५ हजार हेक्टर जमीन सिंचनापासून दूर आहे. स्थानिक पातळीवर भूजल स्त्रोत निर्माण करुन गावकरी पिके घेतात. मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा वाटा ग्रामस्थांपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तिन्ही प्रकल्पांतील मध्यभाग असलेल्या या गावांमध्ये आता मागील काही दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले ठराव तयार केले असून जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. साधारणत: २००९ पासून गावकऱ्यांना एकत्रित करीत पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांपर्यंतही पोहोचला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांचा संघर्ष सुरु आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बाराही महिने विहिरींचे पाणी तळाला असते. यासाठी आता ६५ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात जनजागरण केले जात असून लवकरच ग्रामस्थ समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत.काय केल्यास मिटेल प्रश्न ?या ६५ गावातील पाण्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर बंधाºयातून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचन प्रकल्प हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. परभणी तालुक्यातील पेडगाव किंवा मानवत तालुक्यातील आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो, असे ६५ गाव संघर्ष समितीचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले.ही आहेत कायम दुष्काळी गावेपरभणी तालुका- आळंद, मांडाखळी, मोहपुरी, गव्हा, पान्हेरा, पेडगाव, जांब, सोन्ना, बाभूळगाव, पारवा, उजळंबा, उमरी, नरसापूर, डफवाडी, नागापूर, ब्राह्मणगाव, कौडगाव, भोगाव, हसनापूर, तुळजापूर, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, धारणगाव, साटला, हिंगला, समसापूर, सनपुरी, करडगाव, धार, दुर्डी, साबा, मुरुंबा, नांदगाव, राहटी. मानवत तालुका: पिंपळा, पाळोदी, मांडेवडगाव, जंगमवाडी, सावरगाव, सावळी, आंबेगाव, देवलगाव, हत्तलवाडी, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, खरबा, करंजी, रुढी, मानवत रोड, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, इठलापूर, मानोली या गावांचा दुष्काळी गावांत समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ