शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:36 IST

गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.मानवत तालुक्यातील मानोली ते परभणी तालुक्यातील नांदगाव या पट्ट्यामध्ये एकाही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. जायकवाडीचा कालवा असो अथवा निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा, या गावांच्या शेजारुन गेला; मात्र गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून दुष्काळाच्या झळा येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. या ६५ गावांच्या शिवारात प्रत्येक गावातील १ हजार हेक्टर जमीन अशी सुमारे ६५ हजार हेक्टर जमीन सिंचनापासून दूर आहे. स्थानिक पातळीवर भूजल स्त्रोत निर्माण करुन गावकरी पिके घेतात. मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा वाटा ग्रामस्थांपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तिन्ही प्रकल्पांतील मध्यभाग असलेल्या या गावांमध्ये आता मागील काही दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले ठराव तयार केले असून जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. साधारणत: २००९ पासून गावकऱ्यांना एकत्रित करीत पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांपर्यंतही पोहोचला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांचा संघर्ष सुरु आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बाराही महिने विहिरींचे पाणी तळाला असते. यासाठी आता ६५ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात जनजागरण केले जात असून लवकरच ग्रामस्थ समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत.काय केल्यास मिटेल प्रश्न ?या ६५ गावातील पाण्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर बंधाºयातून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचन प्रकल्प हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. परभणी तालुक्यातील पेडगाव किंवा मानवत तालुक्यातील आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो, असे ६५ गाव संघर्ष समितीचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले.ही आहेत कायम दुष्काळी गावेपरभणी तालुका- आळंद, मांडाखळी, मोहपुरी, गव्हा, पान्हेरा, पेडगाव, जांब, सोन्ना, बाभूळगाव, पारवा, उजळंबा, उमरी, नरसापूर, डफवाडी, नागापूर, ब्राह्मणगाव, कौडगाव, भोगाव, हसनापूर, तुळजापूर, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, धारणगाव, साटला, हिंगला, समसापूर, सनपुरी, करडगाव, धार, दुर्डी, साबा, मुरुंबा, नांदगाव, राहटी. मानवत तालुका: पिंपळा, पाळोदी, मांडेवडगाव, जंगमवाडी, सावरगाव, सावळी, आंबेगाव, देवलगाव, हत्तलवाडी, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, खरबा, करंजी, रुढी, मानवत रोड, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, इठलापूर, मानोली या गावांचा दुष्काळी गावांत समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ