शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:36 IST

गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.मानवत तालुक्यातील मानोली ते परभणी तालुक्यातील नांदगाव या पट्ट्यामध्ये एकाही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. जायकवाडीचा कालवा असो अथवा निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा, या गावांच्या शेजारुन गेला; मात्र गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून दुष्काळाच्या झळा येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. या ६५ गावांच्या शिवारात प्रत्येक गावातील १ हजार हेक्टर जमीन अशी सुमारे ६५ हजार हेक्टर जमीन सिंचनापासून दूर आहे. स्थानिक पातळीवर भूजल स्त्रोत निर्माण करुन गावकरी पिके घेतात. मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा वाटा ग्रामस्थांपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तिन्ही प्रकल्पांतील मध्यभाग असलेल्या या गावांमध्ये आता मागील काही दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले ठराव तयार केले असून जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. साधारणत: २००९ पासून गावकऱ्यांना एकत्रित करीत पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांपर्यंतही पोहोचला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांचा संघर्ष सुरु आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बाराही महिने विहिरींचे पाणी तळाला असते. यासाठी आता ६५ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात जनजागरण केले जात असून लवकरच ग्रामस्थ समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत.काय केल्यास मिटेल प्रश्न ?या ६५ गावातील पाण्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर बंधाºयातून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचन प्रकल्प हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. परभणी तालुक्यातील पेडगाव किंवा मानवत तालुक्यातील आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो, असे ६५ गाव संघर्ष समितीचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले.ही आहेत कायम दुष्काळी गावेपरभणी तालुका- आळंद, मांडाखळी, मोहपुरी, गव्हा, पान्हेरा, पेडगाव, जांब, सोन्ना, बाभूळगाव, पारवा, उजळंबा, उमरी, नरसापूर, डफवाडी, नागापूर, ब्राह्मणगाव, कौडगाव, भोगाव, हसनापूर, तुळजापूर, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, धारणगाव, साटला, हिंगला, समसापूर, सनपुरी, करडगाव, धार, दुर्डी, साबा, मुरुंबा, नांदगाव, राहटी. मानवत तालुका: पिंपळा, पाळोदी, मांडेवडगाव, जंगमवाडी, सावरगाव, सावळी, आंबेगाव, देवलगाव, हत्तलवाडी, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, खरबा, करंजी, रुढी, मानवत रोड, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, इठलापूर, मानोली या गावांचा दुष्काळी गावांत समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ