शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:05 IST

जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आणि भीषण पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले. त्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवावी लागली. सलग ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांंना यंदा उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. अनेक गावातील हातपंप कोरडेठाक पडले. इतर पाण्याचे स्रोत आटले. तसेच पाणीपुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे अनेक गावात ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणी स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. काही गावातील पाणी स्त्रोत पूर्णपणे आटत गेले. त्यामुळे वालूर, हट्टा, सिमणगाव, गुळखंड, तळतुंबा, नागठाणा, पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना एप्रिल आणि मे महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. वालूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या ठिकाणी १२ हजार लिटर टँकरच्या ३ तर २४ हजार लिटरच्या ३ खेप, हट्टा, सिमणगाव येथे प्रत्येकी २४ हजार लिटर टँकरची एक, गुळखंड येथे ५ हजार लिटर टँकरच्या २, तळतुंबा येथे १२ हजार लिटरच्या २, नागठाणा येथे २४ हजार लिटरच्या २ खेपा तसेच पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, २४ जूनपर्यंतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला; परंतु, जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हातपंप आणि पाणीपुरवठा करणाºया विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा या गावांचे टँकर सुरू करावे, अशी शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.टँकर सुरू ठेवा : पाच गावांतून दाखल झाले प्रस्ताव४अद्यापही पाणी टंचाई दूर न झाल्याने नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपळगाव, गोसावी, गुळखंड, पिंपरी या गावात उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.४सेलू तालुक्यातील या गाव परिसरात येत्या १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस झाला नाही तर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ