शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:05 IST

जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आणि भीषण पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले. त्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवावी लागली. सलग ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांंना यंदा उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. अनेक गावातील हातपंप कोरडेठाक पडले. इतर पाण्याचे स्रोत आटले. तसेच पाणीपुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे अनेक गावात ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणी स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. काही गावातील पाणी स्त्रोत पूर्णपणे आटत गेले. त्यामुळे वालूर, हट्टा, सिमणगाव, गुळखंड, तळतुंबा, नागठाणा, पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना एप्रिल आणि मे महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. वालूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या ठिकाणी १२ हजार लिटर टँकरच्या ३ तर २४ हजार लिटरच्या ३ खेप, हट्टा, सिमणगाव येथे प्रत्येकी २४ हजार लिटर टँकरची एक, गुळखंड येथे ५ हजार लिटर टँकरच्या २, तळतुंबा येथे १२ हजार लिटरच्या २, नागठाणा येथे २४ हजार लिटरच्या २ खेपा तसेच पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, २४ जूनपर्यंतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला; परंतु, जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हातपंप आणि पाणीपुरवठा करणाºया विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा या गावांचे टँकर सुरू करावे, अशी शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.टँकर सुरू ठेवा : पाच गावांतून दाखल झाले प्रस्ताव४अद्यापही पाणी टंचाई दूर न झाल्याने नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपळगाव, गोसावी, गुळखंड, पिंपरी या गावात उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.४सेलू तालुक्यातील या गाव परिसरात येत्या १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस झाला नाही तर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ