शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

परभणी : मागणी ३१२ कोटींची; मिळाले ८७.६२ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:12 IST

जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला आहे. एवढ्या तुटपुंज्या निधीतून ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांना मदत द्यायची कशी, असा सवाल उपस्थित झाला आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९३३.६२ हेक्टरवरील शेतीमधील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ४ लाख ५४ हजार ६९८.३७ हेक्टर जमिनीवरील जिरायत पिकांचा तर १ हजार ७१९.४८ हेक्टर जमिनीवरील बागायत व ५१५.७७ हेक्टर जमिनीवरील फळ पिकांचा समावेश आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिरायत पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या जुन्या दरानुसार ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपयांची तर बागायत पिकांची २ कोटी ३२ लाख आणि फळ पिकांसाठी ९२ लाख ८३ हजार अशी एकूण ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची मागणी शेतकºयांना देण्यात येणाºया मदतीसाठी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार जिल्ह्याला मदत मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. १८ नोव्हेंबर रोजी महसूल व वनविभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात जिल्ह्याला तुटपुंजा निधी देण्यात आला आहे. शेती पिकांसाठी ८ हजार प्रति हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक पिके (फळबागा) यासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराने २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याला ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये देण्यात आले आहेत. जुन्याच निकषात तब्बल ३१२ कोटी ४४ लाख रुपये जिल्ह्याला हवे असताना नवीन निकषात फक्त ८७ कोटी ६७ लाख रुपयेच देण्यात आल्याने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांना ही मदत द्यायची कशी, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमधून संतापाची भावना आहे.३३ टक्के नुकसान मदतीस पात्र४या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात शेती व फळ पिकांच्या नुकसानीसाठी मदत देताना ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेलेच शेतकरी अनुज्ञेय राहतील, असे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मदत दिली जाणार आहे. सदरील मदत पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून या मदतीमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दुष्काळी सवलती लागू४अतिवृष्टीने नुकसान झाल्याने काही दुष्काळी सवलती शासनाने लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सूट देण्यात आली असून शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे.४असे असले तरी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क बºयाच ठिकाणी जमा केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जमा केलेले शुल्क त्यांना परत द्यावे लागणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधून होत आहे.सर्व तालुक्यांना निधी वितरित४राज्यशासनाकडून निधी प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तातडीने हा निधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्याला १५ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये, सेलूला ९ कोटी ८० लाख ३९ हजार रुपये, जिंतूरला १४ कोटी १ लाख ८ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.४पाथरी तालुक्याला ८ कोटी २० लाख २७ हजार रुपये, मानवतला ७ कोटी १४ लाख ९८ हजार रुपये, सोनपेठ तालुक्याला ५ कोटी ३१ लाख ५८ हजार रुपये, गंगाखेड तालुक्याला ९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये, पालम तालुक्याला ८ कोटी ४ लाख ९८ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्याला ९ कोटी ९० लाख ५० हजार रुपये असे एकूण ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीfundsनिधी