शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:12 AM

सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत. त्या शेतकºयांनी यापूर्वी कृषपंपासाठी वीज जोडणी घेतलेली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसणार नाही. जेणेकरुन रात्री- अपरात्री सिंचनासाठी शेतकºयांना जावे लागत होते. यापासून दिलासा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील ५ हजार ९६८ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ६०४ शेतकºयांचे अर्ज विविध कारणाअभावी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ३ हजार ३६५ अर्ज हे मंजूर झाले. त्यापैकी ८८६ शेतकºयांना सौर कृषीपंपासाठी महावितरण कंपनीने कोटेशन दिले आहे. विशेष म्हणजे कोटेशन देण्यात आलेल्या ४०६ शेतकºयांनी आपल्या हिस्स्याची रक्कमही वीज वितरण कंपनीकडे भरली आहे. कोटेशन भरलेल्या ३५९ शेतकºयांनी एजन्सीची निवड केली असून सीआरआय पंपस्, टाटा पॉवर सोलार सिस्टीम, मुद्रा सोलार, रवींद्र एनर्जी व जैन इरिगेशन सिस्टीम या एजन्सीच्या माध्यमातून ७८ शेतकºयांच्या वीज जोडणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश महावितरणने दिले असून एजन्सीनेही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पात्र ठरलेल्या ४५ शेतकºयांनी अद्यापही काम करणाºया एजन्सीची निवड केली नाही. त्यामुळे या शेतकºयांची कामे प्रलंबित आहेत. एजन्सीची निवड केल्यास लवकर कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली.१४४ शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून दिली जोडणीशेतकºयांना उच्चदाब प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने जवळपास ६ महिन्यांपूर्वी ऊर्जा विभागाने जिल्ह्यातील कृषीपंपधारकांसाठी ८६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र विद्युत रोहित्र देण्यात येत आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून ८१४ विद्युत रोहित्र अद्यापपर्यंत उभे करण्यात आले आहेत.१४४ शेतकºयांना वीज जोडणीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी दिली.अशी करावी लागते नोंदणी४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही आॅनलाईन असून शेतकºयांना स्वत: महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोणतेही कागदपत्र आॅफलाईन स्वीकारण्यात येत नाहीत. अर्जदारांनी अर्ज करीत असताना सातबारा,पाण्याचे स्त्रोत, जमिनीचे क्षेत्रफळ, आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आदींची माहिती त्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ५ एकरपर्यंत ३ एचपी व ५ एकरवरील क्षेत्रफळास ५ एचपीचा सौरपंप मंजूर केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती