शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

परभणी : कामे न करताच उचलली लाखोंची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:04 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़राज्यातील दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही पथदर्शी योजना राबविली़ या योजनेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांना एकत्रित करून त्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली़ काही कामे लोकसहभागातून तर काही कामे शासनाच्या निधीतून केली जात आहेत़ जिल्ह्यामध्ये या योजनेचा चौथा टप्पा सुरू आहे़ मात्र इतर योजनांप्रमाणेच जलयुक्त शिवार योजनेलाही प्रशासकीय उदासिनता कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षे जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे झाली असली तरी या योजनेचा परिणाम मात्र दिसून येत नाही़ जिल्ह्यात सद्यस्थितीला तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये कामांना मंजुरी देण्यात आली; परंतु, प्रत्यक्षात ही कामे पूर्ण करण्यापूर्वीच बिले उचलण्याचा प्रकार झाल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे़पूर्णा तालुक्यात २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ३१ मार्च २०१८ अखेर वझूर, लिमला, दस्तापूर, शिरकळस, एरंडेश्वर, आहेरवाडी, धानोरा काळे, नावकी, बलसा, मजलापूर या गावांमध्ये ढाळीच्या बांधाची कामे करण्यात आली़ या संदर्भात कृषी सहाय्यकांकडे विचारणा केल्यानंतर आम्ही कामे केलीच नाहीत़ या कामांबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, असे कृषी सहाय्यक सांगत आहेत़ कृषी सहाय्यकांना जर ढाळीच्या बांधाच्या कामांविषयी माहिती नसेल तर ही कामे कोणी केली? असा प्रश्न निर्माण होत असून, कामे न करताच बोगस बिले तयार करून शासनाचा निधी गिळंकृत करण्यात आला़ त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे़ जलयुक्त शिवार या महत्त्वकांक्षी प्रकल्पातही जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार होत असल्याने ज्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली तो उद्देशच सफल होत नाही़ प्रत्यक्षात कामे न करताच बिले उचलण्याचा प्रकार निदर्शनास आला असून, या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, दत्तराव मुळे, ब्रह्मानंद सावंत, गणेश देशमुख, शिवाजी गमे, अंकुश देशमुख, मधुकर वरकड, नारायण आळसे, अंजानराव मुंडे आदींनी केली आहे़अल्प काळात कामे : झालीच कशी?४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ढाळीच्या बांधांचे बिले उचलण्यात आली आहेत़ ही बिले उचलताना कालावधी मात्र कमी दाखविण्यात आला आहे़ मार्च महिन्यामध्ये कामे उरकून घेण्याची गडबड असल्याने बिले सादर करताना एका दिवसांच्या फरकातच कामाला मंजुरी आणि काम पूर्ण केल्याचेही दाखविण्यात आले आहे़ ढाळीचे बांध बांधण्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो़ परंतु, अनेक बिलांचे अवलोकन केले असता, यापेक्षा कमी कालावधीत काम पूर्ण झाल्याचे दाखविले जात आहे़ त्यामुळे या कामांविषयी शंका उपस्थित होत असल्याचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले़आकस्मीक खर्चातून लाखोंचा गैरव्यवहारढाळीच्या बांधाचे बिले उचलत असताना कृषी विभागाकडून आकस्मीक खर्च व देखरेख खर्चाच्या नावाखाली रक्कम उचलण्यात आली आहे़ हा आकस्मीक खर्च नेमका काय आहे ? असा सवाल उपस्थित होत असून, या प्रकाराचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़अनेक प्रश्न अनुत्तरितच४पूर्णा तालुक्यातील काही गावांमध्ये ढाळीचे बांध ही कामे झाली नाहीत़ या संदर्भात कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांनी आम्ही कामे केली नाहीत, असे तालुका कृषी अधिकाºयांना लेखी सांगितले आहे़ तसेच उपविभागीय कृषी अधिकाºयांनाही या संदर्भात पत्र पाठविण्यात आले़ त्यामुळे जर कृषी सहाय्यकांनी कामे केली नसतील तर ही कामे कोणी केली? याची तपासणी होणे अपेक्षित होते़ परंतु, कामांची तपासणी न करताच निधीचे वितरण कसे काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे़ त्यामुळे अधिकाºयांविषयीही संशय निर्माण झाला असून, जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पbillबिल