शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीऊ भिजपावसाने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:12 IST

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या भिज पावसाने सलाईनवर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. रिमझिम पावसाच्या सरीने यावर्षी प्रथमच निर्माण झालेले पावसाळी वातावरण जिल्हावासियांना सुखावत आहे.यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम होती. पावसाची प्रतीक्षा करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. शुक्रवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला. जिल्हाभरात सर्वदूर भिजपाऊस झाला आहे. रात्री ११ वाजेपासून अनेक भागात पावसाने हजरी लावली. त्यामुळे वातावरणात बºयापैकी गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ८७ टक्के पेरण्या झाल्या. शेतकऱ्यांनी जोखीम पत्करुन पेरा केला; परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. अंकुरलेली पिके कोमेजून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच मागील आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी अधिकच धास्तावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेला पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला आहे.परभणी शहर आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला भुरभूर असलेला हा पाऊस काही वेळानंतर रिमझिम स्वरुपात बरसत राहिला. शनिवारी सकाळच्या सुमारासही मध्यम पावसाच्या दोन-तीन सरी कोसळल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाऊस कायम होता. पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. शहरासह पालम, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.पालममध्ये चिंतेचे वातावरण दूर४पालम तालुक्यात १९ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी पिके वाचविण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांचे चिंतेचे वातावरण काही काळासाठी दूर झाले आहे. यावर्षी तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद, संकरित ज्वारी या पिकांची कोरडी पेरणी केली आहे. अनेकांनी कापसाची लागवड उरकून घेतली होती. जुलै अर्धा संपत आला तरी पाऊस बरसत नसल्याने पिके सुकत होती. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने या पिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी देखील शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु होता.गंगाखेड तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी४दीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमेजत असलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला असून, पिके पुन्हा डोलू लागली आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत माखणी मंडळात सर्वाधिक १२ मि.मी., राणीसावरगाव मंडळात ८ मि.मी., गंगाखेड मंडळात ६ मि.मी. व महातपुरी मंडळात ३ मि.मी असा तालुक्यात ७.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे.सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस४शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.४३ मि.मी. पाऊस झाला. पालम तालुक्यात सर्वाधिक १६.३३ मि.मी., सोनपेठ तालुक्यात १३ मि.मी., गंगाखेड ७.२५ , पूर्णा ७.४०, सेलू २.४०, मानवत १.३३ आणि पाथरी तालुक्यात ०.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ