शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

परभणी : उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने लाभार्थी निवड रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:50 IST

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाला अद्यापपर्यंत उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार &७७४ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाला अद्यापपर्यंत उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार &७७४ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करीत असताना यांत्रिकीकरणाची व जोडधंद्याची सोय व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत शेतकºयांना २४ कृषी निविष्ठांसाठी अनुदान दिले जाते. २०१८-१९ साठी १ ते ३० जून या ३० दिवसांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये अनुदान तत्वांवरील कृषी निविष्ठांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. २४ कृषी निविष्ठांसाठी जिल्ह्यातील ७ हजार ७७४ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव त्या त्या तालुका कृषी कार्यालयाकडे दाखल केले होते. प्राप्त प्रस्तावांसाठी जिल्ह्यातील मानवत, परभणी, गंगाखेड, सोनपेठ या चार तालुक्यात सोडत पद्धतही घेण्यात आली. तर येत्या चार दिवसांमध्ये पालम, जिंतूर, सेलू व पाथरी या चार तालुक्यातील प्राप्त अर्जांवर त्या त्या कृषी कार्यालयात सोडत पद्धतीद्वारे लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.कृषी विभागाला लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करुन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्यापही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा कृषी विभागाला उद्दिष्टच प्राप्त झाले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ७ हजार ७७४ लाभार्थी शेतकºयांनी २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठी शेततळ्याचे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे, फुलशेती, फळबाग लागवड, हळद लागवड, फवारणी यंत्र, औजारे, पॉवर ट्रील, ट्रॅक्टर, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन, लागवड साहित्य, हरितगृह ग्रीन हाऊस आदी २४ कृषी निविष्ठांच्या अनुदानासाठी प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.याकडे जिल्हा कृषी विभागाने लक्ष देऊन जिल्ह्याला उद्दिष्टप्राप्तीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून होत आहे.असे प्राप्त झाले अर्जजिल्ह्यात ७ हजार ७७४ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये परभणी २१६६, पालम ५५६, पूर्णा १०५६, मानवत १०१४, गंगाखेड ३९१, सोनपेठ १७६, जिंतूर १४७१, सेलू ६९८, पाथरी ६११ असे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उद्दिष्टप्राप्तीनंतर या शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.१ कोटी २४ लाखांचे गतवर्षीचे देणेराष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अनुदान तत्वावरील कृषी निविष्ठांसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील काही शेतकºयांचे १ कोटी २४ लाख रुपये गतवर्षीचेच देणे कृषी विभागाकडे बाकी आहे. त्यातच यावर्षीचेही उद्दिष्ट अद्याप प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी शेतकरी चिंतेत सापडल्याचे दिसून येत आहे.पालममध्ये २० आॅगस्ट रोजी सोडतपालम तालुका कृषी कार्यालयात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध योजनांसाठी २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोडत होऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील शेतकºयांनी कांदाचाळसाठी २९०, सेडनेट १२४, उच्चदर्जा भाजीपाला लागवड १९, पॉलीहाऊस १४, फळबाग ५६, पॅक हाऊस २१ असे अर्ज दाखल केले आहेत. प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकºयांनी सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.व्ही. मस्के व विभागप्रमुख संतोष गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरी