शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी: राजकीय हस्तक्षेपानेच बारगळली प्लास्टिकबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:58 IST

प्लास्टिक बंदीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनानेही कारवाईयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सेलूत प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टीकच्या पुष्पगुच्छावरुन संताप व्यक्त केल्याने आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सेलूकरांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्लास्टिक बंदीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनानेही कारवाईयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सेलूत प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टीकच्या पुष्पगुच्छावरुन संताप व्यक्त केल्याने आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सेलूकरांचे लक्ष लागले आहे.शहरातील हातगाड्यांवर फळे व भाजीपाला विक्रेते ग्राहकांना कॅरीबॅग सर्रासपणे देत आहेत. मोठे व्यापारी लग्न आणि इतर समारंभात वापरात येणाऱ्या प्लॅस्टिक पत्रावळी, ग्लास आदी साहित्य आजही आपल्या दुकानात ठेऊन ग्राहकांना विक्री करतात.वास्तविक पाहता प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे नगरपालिकेचे काम आहे. सुरुवातीच्या काळात नगरपालिकेने शहरातील किरकोळ प्लॅस्टिक विक्री करणाºया छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करीत दंड वसूल केला. शहरातील प्लास्टिक विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लोकप्र्रतिनिधींमध्ये जाणवला आहे. त्यामुळे कारवाई केली तर त्यात सत्ताधारी मंडळीचा हस्तक्षेप होतो. शेवटी कारवाई करणाºया पालिका कर्मचाऱ्यांना तोंडघशी पडावे लागते. या कारणातून सेलू शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची खंत नागरिकांना आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहीम गतीमान करून नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आजही शहरात नियमित स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी साचणाºया कचºयाचे ढीग नष्ट करण्यात पालिकेने यश मिळविले. मात्र प्लास्टिकसारख्या विषयावर नगरपालिका प्रशासन कचखाऊ भूमिका का घेते? हे समजणे अवघड झाले आहे.दररोजच्या कचºयामध्ये कॅरीबॅग आणि बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा भरणा पालिकेला आढळून येतो. म्हणूनच बंदी असूनही शहरात प्लॅस्टिक येते कोठून? असा प्रश्न खुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच उपस्थित केला. त्यामुळे येत्या काळात याचे उत्तर नगरपालिका प्रशासन कारवाई करून देते की? गुळगुळीत उत्तरे देऊन वेळकाढू धोरण अवलंबिले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, प्लॅस्टिक वापराचा सर्वाधिक त्रास नगरपालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाºयांना आहे, असे असतानाही राजकारणासाठी कारवाई करून रोष नको? या भूमिकेतून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.निर्णयाचे भान न ठेवल्यानेच संताप४शेतकरी विमा मदत केंद्राचे उद्घाटन आणि शेतकºयांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम सेलू दौºयावर आले होते. त्यांच्या स्वागतसाठी प्लास्टिकमध्ये असलेले पुष्पगुच्छ संयोजकांनी पुढे केले आणि कदम यांच्या रागाचा पारा चढला.४राज्यात प्लास्टिक वापरास बंदी असताना प्लास्टीकचे पुष्पगुच्छ समोर ठेवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी असणाºया नेत्यांना आणि तहसीलदार बालाजी शेवाळे यांना कदम यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शहरात सहजपणे मिळणारे प्लास्टिक थेट ज्या मंत्र्यांनी बंदी घातली त्यांचाच समोर आणण्याचे भान देखील कार्यकर्त्यांना कसे राहिले नाही? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदीGovernmentसरकार