शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

परभणी : मांडवा येथे ४ एकरावरील केळीची बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:17 IST

सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. तसेच पावसाअभावी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. परिणामी सिंचनासह पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आतापर्यंत फळबागा जगविल्या. मात्र दोन महिन्यांपासून भूजलपातळीत मोठी घट झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. मांडवा येथील केशव उद्धवराव आरमळ व रघुनाथ उद्धवराव आरमाळ यांनी चार एकरवर केळीची लागवड केली होती; परंतु, पाण्याअभावी केळीची झाडे करपली आहेत. फळबाग लागवड करण्यासाठी आतापर्यंत ३ लाख रुपयांचा खर्च झाला. निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले असते तर या बागा वाचल्या असत्या; परंतु, अद्यापपर्यंत पाण्याचे नियोजन नसल्याने केळीच्या बागा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, आरमळ यांनी या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले असून जळालेल्या केळी बागांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.विमा संरक्षण नसल्याने शेतकºयांना बसतोय फटका४फळपिकांना विम्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र बागायती शेतीसाठी विमा संरक्षण नसल्याने झालेले नुकसान शेतकºयांनाच सहन करावे लागत आहे.४तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या भागातील बागायती पिकांचा पंचनामा करुन हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी बागायतदार शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी