शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निराधार मुलांचा आधार बनले पुण्यातील अशोक स्नेहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:33 IST

दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.पुणे जिल्ह्यात भोसरी येथे आळंदी मार्गावर असलेल्या चक्रपाणी वसाहतीतील पत्र्याच्या पाच खोल्यांत वसलेले स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली ३० मुले येथे गुण्या गोविंदाने राहतात. आपण स्वीकारलेले व्रत हे सोपे नव्हते, याची अशोकला जाणीव होती. रात्र पाळीत कंपनीची नोकरी सांभाळून तो मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना इ. भागांत फिरायचा. तेथे आत्महत्याग्रस्त, कर्जबाजारी, ऊसतोड किंवा मजुरी करणाºया शेतकरी कुटुंबातील मुलाचा शोध घ्यायचा. आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असेही घर तो पाहायचा. आशातूनच मुले निवडण्यात आली. आज अशाच घरातील २५ मुलांना दत्तक घेत त्यांच्यासाठी पुण्यातील भोसरी येथे अशोक स्रेहवन सुरु केले आहे. याच नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. अर्थात हे सगळे करण्यासाठी नोकरी सोडणे आवश्यक होते. साधारणत: आॅगस्ट २०१६ ची गोष्ट. कंपनीला तसा निर्णय कळविल्यानंतर तेथील अधिकारीही चक्रावून गेले. मात्र आपण हाती घेतलेले व्रत सोडायचे नाही, अशी मानसिकता अशोकने बनविली होती. स्रेहवन साकारताना सुरुवातीला मोठी अडचण झाली होती, ती भांडवलाची. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम सुरु करायचा आहे, असे सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल कोटे यांनी आपले पाच खोल्यांचे घर मोफत उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर नोकरीत जमा केलेली दोन लाखांची पुंजीही अशोकने उपयोगात आणली. राहुल देशपांडे, सच्चिदानंद कुलकर्णी, अवधूत खरमाळे, नितीन जिरासे, कविता मरुडकर यांनी आपापल्यापरीने मदत करीत स्रेहवन उभारले.नोकरी सोडून शेतकºयांच्या मुलांना दत्तक घेण्याच्या संकल्पनेला अशोकच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. मात्र आपल्या मुलाची धडपड, ध्येय, शेतकºयांच्या मुलाविषयी असलेली कणव या गोष्टी पाहता त्यांनीही मुलाला या प्रवासात साथ देण्याचे ठरविले. आपले गाव सोडून ते मुलांसोबत राहतात. अशोकचे वडील वारकरी सांप्रदायातील असल्याने मुलांना मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.एकीकडे नोकरी सोडली असताना दुसरीकडे अशोकचे आई-वडिल घरी सून आणण्याच्या तयारीत होते. शेतकरी सुनील काठोळे हे देशमाने यांच्या नात्यातील होते. त्यांच्या अर्चना या मुलीचे स्थळ सांगून आले होते. हाती नोकरी नाही आणि डोक्यात तर स्नेहवन घडविण्याचे स्वप्न ही सर्व स्थिती अशोकने अर्चनाला समजून सांगितली. लग्नाच्या दुसºयाच दिवशी पाच खोल्यांच्या पत्र्याच्या घरात म्हणजेच स्रेहवनमध्ये अशोक, अर्चना व त्यांचे स्रेहवन कुुटुंब एकमेकांत मिसळून गेले.चार कोटींची जमीन दानभोसरीतील डॉ.रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने स्वत:ची दोन एकर जागा आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी काम करणाºया स्रेहवन संस्थेला दान केली. त्यामुळे जागेचा प्रश्न मिटला.दरम्यान, स्रेहवनच्या माध्यमातून शेतकºयांच्या मुलांसाठी आणखी वाढीव काम करण्याची इच्छा आहे. समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यास अनेक प्रस्तावित कामे मार्गी लागतील, असे ‘लोकमत’शी बोलताना अशोक देशमाने यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरीPuneपुणे