शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निराधार मुलांचा आधार बनले पुण्यातील अशोक स्नेहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:33 IST

दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या तरुणाने पुण्यात उभारलेले स्रेहवन एक आशेचा किरण बनले असून, अनेक निराधारांना आधार मिळाला आहे.पुणे जिल्ह्यात भोसरी येथे आळंदी मार्गावर असलेल्या चक्रपाणी वसाहतीतील पत्र्याच्या पाच खोल्यांत वसलेले स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली ३० मुले येथे गुण्या गोविंदाने राहतात. आपण स्वीकारलेले व्रत हे सोपे नव्हते, याची अशोकला जाणीव होती. रात्र पाळीत कंपनीची नोकरी सांभाळून तो मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना इ. भागांत फिरायचा. तेथे आत्महत्याग्रस्त, कर्जबाजारी, ऊसतोड किंवा मजुरी करणाºया शेतकरी कुटुंबातील मुलाचा शोध घ्यायचा. आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असेही घर तो पाहायचा. आशातूनच मुले निवडण्यात आली. आज अशाच घरातील २५ मुलांना दत्तक घेत त्यांच्यासाठी पुण्यातील भोसरी येथे अशोक स्रेहवन सुरु केले आहे. याच नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. अर्थात हे सगळे करण्यासाठी नोकरी सोडणे आवश्यक होते. साधारणत: आॅगस्ट २०१६ ची गोष्ट. कंपनीला तसा निर्णय कळविल्यानंतर तेथील अधिकारीही चक्रावून गेले. मात्र आपण हाती घेतलेले व्रत सोडायचे नाही, अशी मानसिकता अशोकने बनविली होती. स्रेहवन साकारताना सुरुवातीला मोठी अडचण झाली होती, ती भांडवलाची. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम सुरु करायचा आहे, असे सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल कोटे यांनी आपले पाच खोल्यांचे घर मोफत उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर नोकरीत जमा केलेली दोन लाखांची पुंजीही अशोकने उपयोगात आणली. राहुल देशपांडे, सच्चिदानंद कुलकर्णी, अवधूत खरमाळे, नितीन जिरासे, कविता मरुडकर यांनी आपापल्यापरीने मदत करीत स्रेहवन उभारले.नोकरी सोडून शेतकºयांच्या मुलांना दत्तक घेण्याच्या संकल्पनेला अशोकच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. मात्र आपल्या मुलाची धडपड, ध्येय, शेतकºयांच्या मुलाविषयी असलेली कणव या गोष्टी पाहता त्यांनीही मुलाला या प्रवासात साथ देण्याचे ठरविले. आपले गाव सोडून ते मुलांसोबत राहतात. अशोकचे वडील वारकरी सांप्रदायातील असल्याने मुलांना मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.एकीकडे नोकरी सोडली असताना दुसरीकडे अशोकचे आई-वडिल घरी सून आणण्याच्या तयारीत होते. शेतकरी सुनील काठोळे हे देशमाने यांच्या नात्यातील होते. त्यांच्या अर्चना या मुलीचे स्थळ सांगून आले होते. हाती नोकरी नाही आणि डोक्यात तर स्नेहवन घडविण्याचे स्वप्न ही सर्व स्थिती अशोकने अर्चनाला समजून सांगितली. लग्नाच्या दुसºयाच दिवशी पाच खोल्यांच्या पत्र्याच्या घरात म्हणजेच स्रेहवनमध्ये अशोक, अर्चना व त्यांचे स्रेहवन कुुटुंब एकमेकांत मिसळून गेले.चार कोटींची जमीन दानभोसरीतील डॉ.रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने स्वत:ची दोन एकर जागा आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी काम करणाºया स्रेहवन संस्थेला दान केली. त्यामुळे जागेचा प्रश्न मिटला.दरम्यान, स्रेहवनच्या माध्यमातून शेतकºयांच्या मुलांसाठी आणखी वाढीव काम करण्याची इच्छा आहे. समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यास अनेक प्रस्तावित कामे मार्गी लागतील, असे ‘लोकमत’शी बोलताना अशोक देशमाने यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरीPuneपुणे