शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

परभणी : ११ केंद्रांवरील सर्वच कर्मचारी बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अन्य केंद्रावर बदली केली आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या मंजुरीने १२ वीच्या परीक्षेत कॉप्यांना आळा घालण्यासाठी शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहसंचालक, लिपीक व शिपाई यासर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अन्य केंद्रावर बदली केली आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. ६१ केंद्रावर या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षांमध्ये नेहमीप्रमाणे कॉप्यांचा सुळसुळाट पहिल्या दिवसांपासूनच पहावयास मिळत आहे. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. या परीक्षेत परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर शिक्षकच विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतरही अनेक परीक्षा केंद्रावर कॉप्यांचे प्रकार सुरुच होते. २४ फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर तब्बल ६५ परीक्षार्थ्यांना कॉप्या करताना पकडण्यात आले होते. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी अधिक प्रमाणात कॉपीचा संशय असलेल्या परीक्षा केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच इतर केंद्रांवर बदल्या करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील जय भवानी उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्तंडवाडी येथील संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनपेठ तालुक्यातील उखळी येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, पूर्णा येथील संस्कृती कनिष्ठ महाविद्यालय, जिंतूर तालुक्यातील बामणी येथील ब्रह्मश्वर कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथील संत तुकाराम कन्या माध्यमिक विद्यालय, परभणी येथील कारेगावरोड भागातील मन्नाथ कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, लोहगाव येथील श्री नृसिंह माध्यमिक विद्यालय, गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील कै. रेखाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय व इसाद येथील बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय या ११ परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, लिपीक व शिपाई या सर्वांची अन्य केंद्रावर बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयास पाठविण्यात आला. या प्रस्तावास तातडीने वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी या संदर्भातील आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वाहुळ यांनी काढले आहेत. त्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.चार दिवसांत : ८७ विद्यार्थ्यांवर कारवाई४जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी कॉप्या करणाºया १५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी १, २२ फेब्रुवारी रोजी ३ व २४ फेब्रुवारी रोजी ६८ परीक्षार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहेत. तोपर्यंत परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा शिक्षणाधिकारी डॉ.वाहुळ यांनी दिला आहे.मंगळवारी बारावीच्या परीक्षेला ३७ विद्यार्थ्यांची दांडी४२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन सत्रात पार पडलेल्या परीक्षेला ३७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात एमसीव्हीसी विषयाची परीक्षा झाली.४त्यामध्ये ५८७ पैकी ५६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात तर्कशास्त्र विषयाच्या परीक्षेला १२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकूण ४५७ विद्यार्थ्यांनी तर्कशास्त्र विषयाची परीक्षा दिली आहे.जिल्हास्तरीय दक्षता समितीने केलेल्या शिफारसीनुसार बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक, लिपिक व शिपाई यांच्या इतरत्र बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला विभागीय शिक्षण मंडळाने मंजुरी दिली आहे.-डॉ.वंदना वाहुळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी, परभणी.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा