शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

परभणी : ९ गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:14 IST

मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.वीज वितरण कंपनीने पूर्णा शहर व ग्रामीण भागामधील वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी विविध भागांत पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. मागील एक वर्षापासून वीज बिल न भरणाऱ्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सिरकळस, माखणी, खांबेगाव, धानोरा मोत्या, चांगेफळ, कंठेश्वर, आजदापूर, कानखेड- १, कानडखेड -२ या नऊ गावांचा मागील आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या नऊ गावांमध्ये वीज बिलापोटी १ कोटी ३० लाख रुपये थकित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पाणीटंचाईचे संकट४पूर्णा तालुक्यातील नऊ गावांमधील वीजपुरवठा महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; परंतु, काही गावांनी अपेक्षित बिलाची रक्कम जमा केल्याने त्या गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज वितरण कंपनीने खंडित केलेल्या नऊ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.वीजपुरवठा खंडित केलेल्या गावातील ग्रामस्थांना किमान मागील एक वर्षाचे वीज बिल भरणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी थकित वीज बिल भरल्यास महावितरणकडून नऊ गावांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.-सचिन कल्याणकर,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमनwater scarcityपाणी टंचाई