शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पारभणी : पावसाळ्याच्या तोंडावर ९४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:02 IST

शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांवर परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनाची भिस्त आहे. मात्र मागील काही वर्षांपासून प्रकल्पांत पाणीसाठा होत नसल्याने टंचाई वाढत चाललेली आहे. मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरीच्या ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले. येलदरी प्रकल्पामध्ये शिल्लक असलेले पाणीही संपले असून निम्न दुधना प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.पावसाळा तोंडावर आला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होण्याइतपत मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पाणीटंचाईला पूर्णविराम मिळेल. सध्या तरी जिल्ह्यातील ९४ गावांमध्ये ९४ टँकरच्या सहाय्याने प्रशासन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करीत आहे. याशिवाय विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती आदी माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्यापपर्यंत मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने आणखी किमान १५ दिवस जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे.पालम तालुक्यात सर्वाधिक टँकर४पाणीटंचाईची सर्वाधिक झळ पालम तालुक्याला बसली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर संपूर्ण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. मात्र गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने पालम तालुक्यात टंचाई वाढली आहे.४ सध्या तालुक्यातील १५ गावे आणि ७ वाड्यांना २३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल जिंतूर तालुक्यातील १६ गावांना १६ टँकर, पूर्णा तालुक्यातील ११ गावांना १४, गंगाखेड तालुक्यातील ६ गावे आणि ८ वाड्यांना १४.४ सेलू तालुक्यातील १० गावांना ११, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, परभणी तालुक्यातील ६ गावांना ४ आणि पाथरी तालुक्यात एका टँकरने पाणीपुरवठा होत आहे.सव्वा लाख: ग्रामस्थांना टँकरचे पाणी४जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. ज्या गावामध्ये कोणताही पाणीस्त्रोत उपलब्ध नाही, अशा गावांना दूर अंतरावरुन टँकरने पाणी आणून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १७ ग्रामस्थांना टँकरचे पाणी दिले जात आहे.४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ९७९, पालम २६ हजार ५५३, पूर्णा १६ हजार ४५२, गंगाखेड ८ हजार ३७२, सोनपेठ ८ हजार ३०३, सेलू ३३ हजार ४७९, जिंतूर २१ हजार ९६ आणि मानवत तालुक्यातील ९ हजार ७८३ ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.ही आहेत जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे४परभणी तालुका- गोविंदपूर, सारंगपूर, इस्माईलपूर, पेडगाव, सिंगणापूर, माळसोन्ना. पालम तालुका-चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, पेंडू खु., सादलापूर, पेंडू बु., बांदरवाडी, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, कापसी, पारवा, फुरतलाव तांडा, गंजी तांडा, पायरीका तांडा, वाडी बु., मार्तंडवाडी, नरहटवाडी, सेलू वलंगवाडी, कोळेवाडी.४पूर्णा तालुका- पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूर, हिवरा, पांगरा लासीना, पिंपळा भत्या, धानोरा, गौर, वाई लासीना. गंगाखेड तालुका- गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी, विठ्ठलवाडी, इळेगाव, गुंडेवाडी, सिरसम शेख, गणेशपुरी मठ, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, फत्तूनाईक तांडा, घटांग्रा तांडा.४सोनपेठ तालुका- नरवाडी, कोथाळा, खपाट पिंपरी, डिघोळ, वंदन. पाथरी तालुका- रेणाखळी. सेलू तालुका- तळतुंबा, वालूर, पिंपरी गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड, मोरेगाव, शिराळा, देवगाव. जिंतूर तालुका- मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी, पांगरी, पानमोडी, गणपूर, सावंगी भांबळे, पाचलेगाव, चारठाणा, शेवडी. मानवत तालुका- पाळोदी, सोनुळा, हातळवाडी, सावळी, कोल्हा, करंजी.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई