शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: साडेतीन महिन्यांत ४९ आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:52 IST

न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत साडेतीन महिन्यांमध्ये तब्बल १०० प्रकरणे बोर्डावर आणून त्यातील ३० प्रकरणांमध्ये ४९ आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत साडेतीन महिन्यांमध्ये तब्बल १०० प्रकरणे बोर्डावर आणून त्यातील ३० प्रकरणांमध्ये ४९ आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयांमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याविषयी चांगलीच जरब निर्माण होण्यास मदत होणार आहे.आयुष्यात कोर्टाची पायरी चढू नये, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. त्यासाठी विविध प्रकारची कारणे असावीत. त्यामध्ये न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर ते वर्षानुवर्षे चालते. यात पैशांचा व वेळेचा अपव्यय होतो.दैनंदिन जीवनात न्यायालयीन प्रकरणांमुळे आर्थिकदृष्ट्याही खच्चीकरण होते. त्यातच न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबाचाही फटकाही सहन करावा लागतो. मात्र त्याला छेद देत येथील जिल्हा न्यायालयाने मागच्या साडेतीन महिन्यांमध्ये १०० हून अधिक प्रकरणांमध्ये सुनावणी घेऊन ते निकाली काढले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयात ११ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून ज्ञानोबा दराडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सहकारी वकिलांच्या मदतीने सर्वच प्रकरणात सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्याचे काम करण्यात आले. त्यात ३० प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाला यश आले असून या प्रकरणांमधील ४९ आरोपींना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करुन शिक्षा सुनावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी हे निकाल सहाय्यभूत ठरणार आहेत.महिला अत्याचार, बलात्काराच्या सर्वाधिक प्रकरणात शिक्षासाडेतीन महिन्यांमध्ये जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, त्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार, विनयभंग या एकंदर महिला अत्याचारावरील सर्वाधिक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात पोस्को अंतर्गत ७ वर्षे कैद, बोरी पोलीस ठाण्यांतर्गत बलात्कार प्रकरणात सात वर्षे कैद, पाथरी पोलीस ठाण्यातील पोस्को अंतर्गत १० वर्षे कैद, बामणी पोलीस ठाण्यांतर्गत दाखल पोस्कोच्या गुन्ह्यात जन्मठेप, चुडावा पोलीस ठाण्यांतर्गत पोस्को गुन्ह्यात तीन महिने कैद, ताडकळस पोलीस ठाण्यांतर्गत दोन आरोपींना एक महिना कारावास, जिंतूर पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंग प्रकरणात १ वर्षाची कैद, बोरी पोलीस ठाण्यातील पोस्को अंतर्गतील गुन्ह्यात तीन वर्षे कारावास तसेच कोतवाली पोलीस ठाण्यातील अपहरण करुन खून करण्याच्या प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.वकिलांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे मोठे योगदानसरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि त्यांना सहकार्य करणाºया सहाय्यक सरकारी वकिलांच्या पथकाबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्यातून नेमलेल्या पैरवी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. या सर्व प्रकरणांमध्ये जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर- लंगर, नितीन खळीकर, मयूर साळापुरीकर, आनंद गिराम, बाबासाहेब घाटे यांच्यासह पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. कलटवार, पैरवी मदतनीस जी.एम.मुरकुटे, प्रमोद सूर्यवंशी, खुने, डी.जी.गायकवाड, आर.पी.जाधव, वंदना आदोडे, शिवाजी भांगे, मीना दिवे, प्रवीण राठोड, मारोती कुंडगीर, एस. एन. सुरनर, व्ही.डी.नगरसाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय