शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

परभणी: साडेतीन महिन्यांत ४९ आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:52 IST

न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत साडेतीन महिन्यांमध्ये तब्बल १०० प्रकरणे बोर्डावर आणून त्यातील ३० प्रकरणांमध्ये ४९ आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत साडेतीन महिन्यांमध्ये तब्बल १०० प्रकरणे बोर्डावर आणून त्यातील ३० प्रकरणांमध्ये ४९ आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयांमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याविषयी चांगलीच जरब निर्माण होण्यास मदत होणार आहे.आयुष्यात कोर्टाची पायरी चढू नये, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. त्यासाठी विविध प्रकारची कारणे असावीत. त्यामध्ये न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर ते वर्षानुवर्षे चालते. यात पैशांचा व वेळेचा अपव्यय होतो.दैनंदिन जीवनात न्यायालयीन प्रकरणांमुळे आर्थिकदृष्ट्याही खच्चीकरण होते. त्यातच न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबाचाही फटकाही सहन करावा लागतो. मात्र त्याला छेद देत येथील जिल्हा न्यायालयाने मागच्या साडेतीन महिन्यांमध्ये १०० हून अधिक प्रकरणांमध्ये सुनावणी घेऊन ते निकाली काढले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयात ११ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून ज्ञानोबा दराडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सहकारी वकिलांच्या मदतीने सर्वच प्रकरणात सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्याचे काम करण्यात आले. त्यात ३० प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाला यश आले असून या प्रकरणांमधील ४९ आरोपींना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करुन शिक्षा सुनावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी हे निकाल सहाय्यभूत ठरणार आहेत.महिला अत्याचार, बलात्काराच्या सर्वाधिक प्रकरणात शिक्षासाडेतीन महिन्यांमध्ये जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, त्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार, विनयभंग या एकंदर महिला अत्याचारावरील सर्वाधिक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात पोस्को अंतर्गत ७ वर्षे कैद, बोरी पोलीस ठाण्यांतर्गत बलात्कार प्रकरणात सात वर्षे कैद, पाथरी पोलीस ठाण्यातील पोस्को अंतर्गत १० वर्षे कैद, बामणी पोलीस ठाण्यांतर्गत दाखल पोस्कोच्या गुन्ह्यात जन्मठेप, चुडावा पोलीस ठाण्यांतर्गत पोस्को गुन्ह्यात तीन महिने कैद, ताडकळस पोलीस ठाण्यांतर्गत दोन आरोपींना एक महिना कारावास, जिंतूर पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंग प्रकरणात १ वर्षाची कैद, बोरी पोलीस ठाण्यातील पोस्को अंतर्गतील गुन्ह्यात तीन वर्षे कारावास तसेच कोतवाली पोलीस ठाण्यातील अपहरण करुन खून करण्याच्या प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.वकिलांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे मोठे योगदानसरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि त्यांना सहकार्य करणाºया सहाय्यक सरकारी वकिलांच्या पथकाबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्यातून नेमलेल्या पैरवी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. या सर्व प्रकरणांमध्ये जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर- लंगर, नितीन खळीकर, मयूर साळापुरीकर, आनंद गिराम, बाबासाहेब घाटे यांच्यासह पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. कलटवार, पैरवी मदतनीस जी.एम.मुरकुटे, प्रमोद सूर्यवंशी, खुने, डी.जी.गायकवाड, आर.पी.जाधव, वंदना आदोडे, शिवाजी भांगे, मीना दिवे, प्रवीण राठोड, मारोती कुंडगीर, एस. एन. सुरनर, व्ही.डी.नगरसाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय