शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

परभणी : ३७६ वन्य प्राण्यांसाठी २० पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:22 IST

अवर्षण परिस्थितीत वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी येथील वन विभागाने जिल्ह्यातील जंगल भागात २० पाणवठे उभारले आहेत.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अवर्षण परिस्थितीत वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी येथील वन विभागाने जिल्ह्यातील जंगल भागात २० पाणवठे उभारले आहेत.जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राण्यांचे स्थलांतर होण्याची शक्यता असते. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातीलच असते. गतवर्षी जंगल भागात ३७६ पशू आढळले होते. त्यात हरीण, काळवीट, मोर, लांडोर, तरस, नीलगाय, उदमांजर, रानडुक्कर, वानर इ. प्राण्यांचा समावेश होता. पशुगणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभाने दुष्काळात जंगलामध्ये २० पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे.परभणी जिल्ह्यातील पशूगणनेत आढळलेल्या पशूंची संख्या (जंगलातील)बिबट्या 1कोल्हा 15हरीण 127नीलगाय 200काळवीट 200वानर 500मोर 9१२ गावांच्या शिवारात वन्यक्षेत्रपरभणी जिल्ह्यात जिंतूर बिटातील केहाळ, सावळी, डिग्रस, इटोली, मोहखेड, टाकळखोपा, आरखेड, मानकेश्वर, सावरगाव, सावळी, चौधरणी, धारखेड आदी ठिकाणी जंगल क्षेत्र आहे. या भागात गायरान जमिनीवर पशुप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी २० कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे दुष्काळातही वन्य प्राण्यांच्या पाण्याची सुविधा झाली आहे. या पाणवठ्यांची वनविभाकडून दररोज पाहणी केली जाते, अशी माहिती वनविभागीय अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीforestजंगलdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई