शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:06 IST

आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे.परभणी जिल्हा हा सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. या जिल्ह्यात खरीप हंगामात मोसमी पावसाच्या पाण्यावर खरीप हंगाम घेतला जातो. तर परतीच्या पावसाने प्रकल्पांमध्ये झालेल्या जलसाठ्यावर रबी हंगामाची भिस्त असते. मागच्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात हा जिल्हा अडकला असून त्याला यावर्षी मात्र काही प्रमाणात समाधानकारक परिस्थिती लाभली आहे. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला. परिणामी जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्पही १०० टक्के भरल्याने या प्रकल्पाचे पाणीही रबी हंगामासाठी उपलब्ध होत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागच्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात १५ हजार ३२२ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे.जिल्ह्यामध्ये करपरा आणि मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाच्या पाण्यामुळे ५९७ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर ३५१ हेक्टर शेत जमिनीचे सिंचन होत आहे. याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून ७२४ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामध्ये ५१३ हेक्टर जमिनीवर जलाशय उपशातून सिंचन होत आहे.१९४ हेक्टर जमिनीवर विहीर उपशाद्वारे सिंचन झाले आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पात मिळून १ हजार ६७२ हेक्टर शेत जमिनीचे सिंचन झाले आहे. यामध्ये येलदरी आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यातून होणाºया सिंचनाचे आकडे वगळले आहेत. यावर्षी सर्व गाव तलाव, विहिरी आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बागायती पिकांना प्राधान्य दिले आहे. त्याचाच परिणाम रबी हंगामात गव्हाची पेरणी १०५ टक्के क्षेत्रावर झाली आहे. तर हरभºयाची पेरणी १५० टक्के क्षेत्रावर झाली आहे. याशिवाय अनेक भागामध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते आणि त्या प्रमाणात जिल्ह्यात पाणी उपलब्ध असल्याने हे क्षेत्र वाढले आहे.जायकवाडी कालवा : साडेपाच हजार हेक्टर जमिनीचे सिंचन४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाहित झाला आहे. ६ तालुक्यांमध्ये या कालव्याच्या सहाय्याने शेत जमिनीचे सिंचन होते. डिसेंबर महिन्यात रबी हंगामासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन देण्यात आले.४ या आवर्तनाच्या सहाय्याने ६ हजार ७६७ हेक्टर शेत जमिनीचे प्रवाही सिंचन झाले आहे. तर याच कालव्यावर ४३९ हेक्टर जमिनीचे थेट मोटार लावून उपसा सिंचन करण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सिंचन झाले असून या विभागाने पाण्याचे दुसरे आवर्तन देण्याची तयारीही सुरु केली आहे.विविध मार्गाने झालेले सिंचन (क्षेत्र हेक्टरमध्ये)कालवा प्रवाही ५७६७कालवा उपसा ४३९नदी-नाले उपसा ३८०विहीर उपसा ६३३७बंधारे उपसा ६८७मध्यम प्रकल्प ९४८लघु प्रकल्प ७२४एकूण: १५०८२

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRainपाऊस