शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:27 IST

तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.जिंतूर तालुक्यामध्ये यावर्षी २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. या पावसाची सरासरी ३४ टक्के आहे. ेआजपर्यंत किमान ५३९ मि. मी. पाऊस होणे आवश्यक होते. तालुक्यातील ओढे, नाले अजूनही कोरडेठाक आहेत. जिंतूर तालुक्यामध्ये लघूसिंचन विभागांतर्गत १६ सिंचन तलाव असून २३ पाझर तलाव आहेत. २० गावांमध्ये तलाव आहेत. यापैकी तालुक्यातील एकाही तलावात जेमतेम सुद्धा पाणी नाही. रायखेडा, डोंगरतळा, भोगाव, चामनी, वरुड, हलविरा या तलावात ५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर ४९ तलावामध्ये ० टक्केही पाणीसाठा नाही. अशीच परिस्थिती लघूपाटबंधारे विभागाच्या तलावांमध्ये आहे. या तलांवामध्ये जेमतेम सुद्धा पाणी नाही. परिणामी भविष्यातील दुष्काळ डोळ्यासमोर दिसत आहे. तालुक्यात मागील ३ वषार्पासून अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. त्यातच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भविष्यामध्ये बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. याकडे शासन गांभीयार्ने पाहत नाही.जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी मध्यम या प्रकल्पामध्ये अद्याप ० टक्के सुद्धा पाणीसाठा नाही. या धरणाखाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची अवस्थाही वाईट आहे. येथेही ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. ज्या धरणावर येलदरी धरण अवलंबून आहे. त्या खडकपुर्णा धरणात सुद्ध हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता येलदरी धरण भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मागील ५ वषार्पासून अशीच परिस्थिती आहे. येलदरी धरणामध्ये ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे;परंतु, त्यातही १८ टक्के गाळ आहे. त्यामुळे नेमका पाणीसाठा किती? हे पाटबंधारे विभाग सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे तालुकावासिय हैराण झाले आहेत.पाच शहर २०० गावांना बसणार फटका४येलदरी व सिद्धेश्वर धरणातून जिंतूर, परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड या मुख्य शहरासह लगत असणाºया २०० पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणात पाणी नसल्याने भविष्यामध्ये या शहरांना व गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.४याच धरणाच्या पाणीपातळीवर शहराचे भवितव्य अवलंबून आहे. येलदरी, सिद्धेश्वर या धरणावर अनेक गावे व शहरे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने या धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी तातडीने राखीव करायला पाहिजे.४ भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रशासनाने नियोजन करणेही आवश्यक आहे.येलदरीत शुन्य टक्के पाणी४येलदरी धरणात किमान मृतसाठ्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ० टक्के पाणी येण्यासाठी साधारणत: ४ ते ५ मीटर पाण्याची गरज आहे. ५ मीटर पाणी आल्यानंतर येलदरी धरण ० टक्के होईल. तर खडकपूर्णा धरण ० टक्के होण्यासाठी ३ मीटर पाणी कमी आहे. हे धरण भरल्यानंतर येलदरीत पाणी येईल हीच परिस्थिती येलदरीच्या खाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची आहे.पर्जन्यमान घटले४यावर्षी जिंतूर तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस पडला. सरासरी ८११.१० मि.मी. एवढी नोंद आहे. २१ आॅगस्टपर्यंत २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. प्रत्यक्षात तो किमान ५३९ मि.मी. होणे अपेक्षित आहे.४येलदरी धरण क्षेत्रात १५० मि.मी., सिद्धेश्वर धरण क्षेत्रात ४३२ मि.मी. तर खडकपूर्णा धरण क्षेत्रात ३०५ मि.मी. पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने धरणामध्ये पाणीसाठा वाढू शकला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीdroughtदुष्काळ