शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:27 IST

तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.जिंतूर तालुक्यामध्ये यावर्षी २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. या पावसाची सरासरी ३४ टक्के आहे. ेआजपर्यंत किमान ५३९ मि. मी. पाऊस होणे आवश्यक होते. तालुक्यातील ओढे, नाले अजूनही कोरडेठाक आहेत. जिंतूर तालुक्यामध्ये लघूसिंचन विभागांतर्गत १६ सिंचन तलाव असून २३ पाझर तलाव आहेत. २० गावांमध्ये तलाव आहेत. यापैकी तालुक्यातील एकाही तलावात जेमतेम सुद्धा पाणी नाही. रायखेडा, डोंगरतळा, भोगाव, चामनी, वरुड, हलविरा या तलावात ५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर ४९ तलावामध्ये ० टक्केही पाणीसाठा नाही. अशीच परिस्थिती लघूपाटबंधारे विभागाच्या तलावांमध्ये आहे. या तलांवामध्ये जेमतेम सुद्धा पाणी नाही. परिणामी भविष्यातील दुष्काळ डोळ्यासमोर दिसत आहे. तालुक्यात मागील ३ वषार्पासून अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. त्यातच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भविष्यामध्ये बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. याकडे शासन गांभीयार्ने पाहत नाही.जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी मध्यम या प्रकल्पामध्ये अद्याप ० टक्के सुद्धा पाणीसाठा नाही. या धरणाखाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची अवस्थाही वाईट आहे. येथेही ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. ज्या धरणावर येलदरी धरण अवलंबून आहे. त्या खडकपुर्णा धरणात सुद्ध हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता येलदरी धरण भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मागील ५ वषार्पासून अशीच परिस्थिती आहे. येलदरी धरणामध्ये ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे;परंतु, त्यातही १८ टक्के गाळ आहे. त्यामुळे नेमका पाणीसाठा किती? हे पाटबंधारे विभाग सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे तालुकावासिय हैराण झाले आहेत.पाच शहर २०० गावांना बसणार फटका४येलदरी व सिद्धेश्वर धरणातून जिंतूर, परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड या मुख्य शहरासह लगत असणाºया २०० पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणात पाणी नसल्याने भविष्यामध्ये या शहरांना व गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.४याच धरणाच्या पाणीपातळीवर शहराचे भवितव्य अवलंबून आहे. येलदरी, सिद्धेश्वर या धरणावर अनेक गावे व शहरे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने या धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी तातडीने राखीव करायला पाहिजे.४ भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रशासनाने नियोजन करणेही आवश्यक आहे.येलदरीत शुन्य टक्के पाणी४येलदरी धरणात किमान मृतसाठ्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ० टक्के पाणी येण्यासाठी साधारणत: ४ ते ५ मीटर पाण्याची गरज आहे. ५ मीटर पाणी आल्यानंतर येलदरी धरण ० टक्के होईल. तर खडकपूर्णा धरण ० टक्के होण्यासाठी ३ मीटर पाणी कमी आहे. हे धरण भरल्यानंतर येलदरीत पाणी येईल हीच परिस्थिती येलदरीच्या खाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची आहे.पर्जन्यमान घटले४यावर्षी जिंतूर तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस पडला. सरासरी ८११.१० मि.मी. एवढी नोंद आहे. २१ आॅगस्टपर्यंत २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. प्रत्यक्षात तो किमान ५३९ मि.मी. होणे अपेक्षित आहे.४येलदरी धरण क्षेत्रात १५० मि.मी., सिद्धेश्वर धरण क्षेत्रात ४३२ मि.मी. तर खडकपूर्णा धरण क्षेत्रात ३०५ मि.मी. पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने धरणामध्ये पाणीसाठा वाढू शकला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीdroughtदुष्काळ