शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:21 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विविध १९ प्रकारच्या कामांचा समावेश केला आहे़ त्याचबरोबर ११ कलमी कार्यक्रमही हाती घेतला आहे़ दरवर्षी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत पुढील वर्षीच्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जाते़ वास्तविक पाहता केलेले नियोजन हे कागदावरच राहत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून या योजनेतून दिसून येत आहे़ मनरेगा योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तर आणि ५० टक्के कामे जि़प़ अंतर्गत ग्रामपंपचायतस्तरावर केली जातात़ मागील काही वर्षांत ग्रामपंचायतस्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरींची घेतली जात आहेत़ ग्रामपंचायतीकडूनही त्याच कामांची मागणी होत आहे़यंत्रणास्तरावर शेत रस्ते, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरण, शेततळी, तुती लागवड या कामांचा समावेश आहे़ यंत्रणास्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागामार्फत कामे केली जातात; परंतु, मनरेगा योजनेच्या कामात सर्वच विभागातील यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येत आहे़त्यामुळे पाथरी तालुक्यातील २१ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही़ त्यामुळे गावात मजुरांना रोजगारही उपलब्ध होत नाही़ तसेच या योजनेवर या २१ गावांमध्ये अद्याप छदामही खर्च झाला नाही़ त्यावरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे़वृक्ष लागवड : केवळ कागदावरचसामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला जातो़ जून महिन्यात या विभागाने २१ गावांमध्ये एकही काम हाती घेतले नाही़ त्यामुळे राज्य शाासनाचा महत्त्वकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम कागदावरच राहिला असल्याचे दिसून येत आहे़ तसेच पाथरी तालुक्यातील केवळ बोरगव्हाण या एका गावातच मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी तुती लागवड कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे़सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सध्या शेतात कामे उपलब्ध नाहीत़ त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे़ अशा परिस्थितीत प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरू होणे आवश्यक आहे़ही आहेत २१ गावेआनंदनगर, बंदरवाडा, बाणेगाव, डाकू पिंप्री, पिंप्री, ढालेगाव, गोपेगाव, जवळा झुटा, वाडी, कानसूर, खेडुळा, लिंबा, लोणी, मंजरथ, मरडसगाव, निवळी, पाटोदा, फुलारवाडी, रामपुरी खु़, सारोळा बु़ व तुरा या गावांमध्ये अद्याप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू झालेले नाही़घरकुल कामासाठी मजूररमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी मनरेगा योजनेत १८ हजार रुपयांची मजुरी उपलब्ध करून दिली जाते़ सध्या तालुक्यात केवळ घरकूल बांधकामासाठीच ३३७ मजूर कामावर आहेत़ त्याशिवाय एकही काम सुरू नाही़ सिंचन विहिरींची कामेही अद्याप सुरू नाहीत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी