शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी :८ हजार रुग्णांवर २१ कोेटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:51 IST

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.दारिद्र्य रेषेखाली आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आली. या योजनेत प्रति लाभार्थी दीड लाख रुपयांपर्यत खर्च शासनाकडून केला जात होता. या योजनेअंतर्गत पांढरे रेशन कार्ड वगळता इतर रेशनकार्ड धारकांनी व एक लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली होती. राज्यामध्ये तीन वर्षे सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करुन घेतले. या योजनेअंतर्गत नोंदणी करुन शेतकºयांनाही उपचार घेता येऊ लागले. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासनाच्या वतीने या योजनेचा प्रसार व प्रचारही करण्यात आला. २०१३ ते २१ मे २०१७ पर्यंत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार ४९२ कुटुंबांची या योजनेत नोंदणी झाली होती. त्यापैकी २० हजार ९६० रुग्णांनी या योजनेअंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले होते. या रुग्णांवर ५० कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला होता.त्यानंतर या योजनेला वाढता प्रतिसाद पाहता राज्य शासनाने १ जुलै २०१७ पासून या योजनेचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असे नामांतर केले. या योजनेअंतर्गत उपचार घेणाºया रुग्णांना २ लाख रुपयापर्यंतचा खर्च करण्यात येत आहे. तसेच राज्यातील कोणत्याही दवाखान्यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेचे नामांतर झाल्यानंतर २०१७-१८ या एका आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३८७ रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. यावर आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल २१ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.तालुकानिहाय उपचार घेतलेले रुग्ण व खर्चमहात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ३८७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्यावर २१ कोटी १५ लाख ९ हजार ४४६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ८७८ रुग्णांची उपचार घेतला आहे. या रुग्णांवर २ कोटी ५१ लाख ७८ हजार, जिंतूर १ हजार २८० रुग्णांवर ३ कोटी २१ लाख २२ हजार ३००, मानवत ५४४ रुग्णांवर १ कोटी ३९ लाख १ हजार ६२४, पालम ४२५ रुग्णांवर १ कोटी १० लाख ७० हजार ७६२, परभणी २ हजार ४६२ रुग्णांवर ६ कोटी १४ लाख ५७ हजार ५७०, पाथरी ६५९ रुग्णांवर १ कोटी ७९ लाख ४० हजार ८०, पूर्णा ८५३ रुग्णांवर २ कोटी १८ लाख ६२ हजार ६५०, सेलू ८४७ रुग्णांवर २ कोटी २५ लाख ७४ हजार २६०, सोनपेठ ४३९ रुग्णांवर १ कोटी ६२ हजार ४०० असा खर्च करण्यात आला आहे.१२८ आजारांचा होईना समावेश२०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्य शासनाने अंमलात आणली. या योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना ९७१ आजारांवर उपचार घेता येत होता. ही योजना राबविताना येणाºया अडचणी लक्षात घेता या योजनेचे १ जुलै २०१७ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नामांतर करण्यात आले. नामांतराबरोबरच नवीन १२८ आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या ११०० आजारावर उपचार घेण्याची सुविधा निर्माण झाली. परंतु, गेल्या एक वर्षापासून नवीन १२८ आजारांचा यात समावेश झाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने केवळ योजनेचे नामांतर करुनच समाधान मानले की काय, असा प्रश्न रुग्णांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना