शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :८ हजार रुग्णांवर २१ कोेटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:51 IST

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.दारिद्र्य रेषेखाली आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आली. या योजनेत प्रति लाभार्थी दीड लाख रुपयांपर्यत खर्च शासनाकडून केला जात होता. या योजनेअंतर्गत पांढरे रेशन कार्ड वगळता इतर रेशनकार्ड धारकांनी व एक लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली होती. राज्यामध्ये तीन वर्षे सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करुन घेतले. या योजनेअंतर्गत नोंदणी करुन शेतकºयांनाही उपचार घेता येऊ लागले. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासनाच्या वतीने या योजनेचा प्रसार व प्रचारही करण्यात आला. २०१३ ते २१ मे २०१७ पर्यंत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार ४९२ कुटुंबांची या योजनेत नोंदणी झाली होती. त्यापैकी २० हजार ९६० रुग्णांनी या योजनेअंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले होते. या रुग्णांवर ५० कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला होता.त्यानंतर या योजनेला वाढता प्रतिसाद पाहता राज्य शासनाने १ जुलै २०१७ पासून या योजनेचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असे नामांतर केले. या योजनेअंतर्गत उपचार घेणाºया रुग्णांना २ लाख रुपयापर्यंतचा खर्च करण्यात येत आहे. तसेच राज्यातील कोणत्याही दवाखान्यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेचे नामांतर झाल्यानंतर २०१७-१८ या एका आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३८७ रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. यावर आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल २१ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.तालुकानिहाय उपचार घेतलेले रुग्ण व खर्चमहात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ३८७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्यावर २१ कोटी १५ लाख ९ हजार ४४६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ८७८ रुग्णांची उपचार घेतला आहे. या रुग्णांवर २ कोटी ५१ लाख ७८ हजार, जिंतूर १ हजार २८० रुग्णांवर ३ कोटी २१ लाख २२ हजार ३००, मानवत ५४४ रुग्णांवर १ कोटी ३९ लाख १ हजार ६२४, पालम ४२५ रुग्णांवर १ कोटी १० लाख ७० हजार ७६२, परभणी २ हजार ४६२ रुग्णांवर ६ कोटी १४ लाख ५७ हजार ५७०, पाथरी ६५९ रुग्णांवर १ कोटी ७९ लाख ४० हजार ८०, पूर्णा ८५३ रुग्णांवर २ कोटी १८ लाख ६२ हजार ६५०, सेलू ८४७ रुग्णांवर २ कोटी २५ लाख ७४ हजार २६०, सोनपेठ ४३९ रुग्णांवर १ कोटी ६२ हजार ४०० असा खर्च करण्यात आला आहे.१२८ आजारांचा होईना समावेश२०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्य शासनाने अंमलात आणली. या योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना ९७१ आजारांवर उपचार घेता येत होता. ही योजना राबविताना येणाºया अडचणी लक्षात घेता या योजनेचे १ जुलै २०१७ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नामांतर करण्यात आले. नामांतराबरोबरच नवीन १२८ आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या ११०० आजारावर उपचार घेण्याची सुविधा निर्माण झाली. परंतु, गेल्या एक वर्षापासून नवीन १२८ आजारांचा यात समावेश झाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने केवळ योजनेचे नामांतर करुनच समाधान मानले की काय, असा प्रश्न रुग्णांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना