शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

परभणी : सिंचन विहिरींवर २३५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:45 IST

शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़कोरडवाहू शेतीमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे़ पावसाच्या भरोस्यावर राहून पिके घेताना अनेक वेळा नुकसानही सहन करावे लागत होते़ त्यामुळे शेतकºयांना हक्काची सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतशिवारात सिंचन विहीर घेण्यासाठी राज्य शासनाने २००८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुदान देऊ केले़ रोहयोच्या माध्यमातून शेतकºयांनी विहिरीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर टप्प्या टप्प्याने अनुदानाची उपलब्ध करून देत कोरडवाहू शेती विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे़ या योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ अनेक कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकºयांनी योजनेचा लाभ घेत शेतीला बागायती स्वरुपही दिले आहे़ सिंचन विहिरीमुळे पिकांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला़ परिणामी शेतकºयांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत झाली आहे़ रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांसाठी जिल्ह्यात ही योजना रावविली जाते़ २००८ ते २०१९ या ११ वर्षांच्या काळात परभणी जिल्ह्यामधून १४ हजार २९३ सिंचन विहिरींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली़ त्यापैकी ८ हजार २९७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, २ हजार ८३८ कामे सद्यस्थितीला सुरु आहेत़ सिंचन विहिरींचे काम करीत असताना कुशल आणि अकुशल या दोन प्रकारांमध्ये लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ कुशलमध्ये मजुरांचे देयके दिली जातात तर अकुशल कामात विहीर बांधकामासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यांना वितरित केला जातो़ ११ वर्षांच्या या काळामध्ये मजुरांच्या वेतनावर १३२ कोटी ४३ लाख ६१ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ तर प्रत्यक्ष बांधकामासाठी १०३ कोटी २ लाख २४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ ८ हजार २९७ विहिरींचे बांधकाम करण्यासाठी जिल्ह्यात २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला़ त्यामुळे सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतीला हक्काचे आणि शाश्वत पाणी उपलब्ध होण्याची संधी मिळाली आहे़ अनेक शेतकºयांनी या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणली आहे़ या पुढेही अनेक प्रस्ताव रोहयो विभागाकडे असून, या प्रस्तावांनाही मंजुरी देवून सिंचन विहिरींची कामे घेतली जात आहेत़गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक सिंचन विहिरीच्११ वर्षांतील सिंचन विहिरींच्या कामकाजाचा आढावा घेतला असता गंगाखेड तालुक्यात शेतकºयांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे़ या तालुक्यात आतापर्यंत २ हजार ८०३ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते़च्त्यापैकी १ हजार ७७५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ त्या खालोखाल जिंतूर तालुक्यात १ हजार ४२७, सेलू तालुक्यात १ हजार २१४, पूर्णा १ हजार ११८, पालम ९६१, मानवत ७००, परभणी ६११, पाथरी २६३ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये २२८ सिंचन विहिरी बांधण्यात आल्या आहेत़च्गंगाखेड तालुक्यामध्ये सिंचन विहिरींवर आतापर्यंत ५४ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च झाला असून, पूर्णा तालुक्यात ६७ कोटी ६६ लाख, सेलू ३६ कोटी ३० लाख, पालम २४ कोटी ४० लाख, जिंतूर ३३ कोटी ४१ लाख, मानवत १७ कोटी १८ लाख, परभणी १६ कोटी ४३ लाख आणि सोनपेठ तालुक्यात ७ कोटी २९ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे़३ हजार प्रस्तावांना मंजुरीया आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेकडे एकूण दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी ३ हजार १५८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यात ३२२, जिंतूर ८९५, मानवत २०२, पालम १८७, परभणी १२०, पाथरी ५४, पूर्णा ४५८, सेलू ४०२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये ५१८ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या सिंचन विहिरींची कामे सध्या सुरू आहेत़ या वर्षभरात एकूण २६८ सिंचन विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यात सर्वाधिक ८५ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यात ५५, पालम ४५, सेलू २८, मानवत २१, गंगाखेड २०, पाथरी १३ आणि जिंतूर तालुक्यात एका सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार