शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:18 PM

येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये रविवारी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली़ परभणी जिल्हा न्यायालयात सकाळी १०़३० वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते लोक न्यायालयाचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा न्यायाधीश ए़एम़ पाटील, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ मनोज कुंभारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविकात लोकन्यायालयातील पॅनल विषयी माहिती दिली़ अध्यक्षीय समारोप करताना प्रमुख जिल्हा सत्र न्या़ उर्मिला जोशी म्हणाल्या, जास्तीत जास्त प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवून ती निकाली काढावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुलकर्णी यांनी केले़ न्या़ एस़एस़ खिरापते यांनी आभार मानले़ या लोकन्यायालयामध्ये फौजदारी, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवाविषयक प्रकरणे, महसूल, दिवाणी आणि बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ५४० प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यातून ६ कोटी ८२ लाख ५६ हजार १ रुपयांची वसुली झाली़ तसेच ११५७ वाद दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी ६६ लाख ३२ हजार ६८६ रुपये वसूल झाले़ दोन्ही मिळून १६९७ प्रकरणे निकाली निघाली असून, ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती न्यायालयाच्या सूत्राने दिली़पाथरीत २८ प्रकरणे निकालीपाथरी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित लोक न्यायालयात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ पाथरी न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयास बँक व्यवस्थापक दास, उपशाखा व्यवस्थापक डी़एम़ गोयले, वसुली प्रतिनिधी प्रकाश मोरे यांची उपस्थिती होती़ या लोकन्यायालयात भारतीय स्टेट बँक कृषी शाखेने ४० वादपूर्व प्रकरणे ठेवली होती़ त्यापैकी २८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यात ५१ लाख ४२ हजार रुपयांपैकी २६ लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आले़ तडजोड प्रकरणे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली असून, कृषी क्षेत्रातील कर्ज प्रकरणात तडजोड झाल्यानंतर लाभधारकास नवीन कर्ज दिले जाईल, असे शाखा व्यवस्थापक दास यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीconsumerग्राहक