खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे. ...
सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़ ...
टंचाई परिस्थितीमध्ये टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या वाढली असून, प्रलंबित प्रस्तावांची संख्याही ३५ वर पोहचल्याने टंचाई उपाययोजनांची कामे संथगतीने होत असल्याचे दिसत आहे़ ...
शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी परभणी बाजार समितीने तातडीने गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत़ ...
महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़ ...
येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही क ...
कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचा ...