शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST

परभणी जंक्शन येथून सध्या २० ते २४ रेल्वे ये-जा करतात. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर यासह मनमाड व परराज्यात ...

परभणी जंक्शन येथून सध्या २० ते २४ रेल्वे ये-जा करतात. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर यासह मनमाड व परराज्यात जाणाऱ्या रेल्वेची सध्या ये-जा सुरू आहे. मात्र, या सर्व रेल्वे आरक्षित असल्याने त्यांना जिल्ह्यातील काही तालुक्यांना थांबे नाहीत. छोट्या स्थानकांवर थांबणाऱ्या पॅसेंजरची सध्याची संख्या केवळ तीनच आहे. यातच जुन्या दोन पॅसेंजर विशेष रेल्वेत परिवर्तित केल्याने त्यांचेही ग्रामीण स्थानकाचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. यामुळे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी अजूनही प्रवाशांना रेल्वेचा पर्याय अवलंबता येत नसल्याचे दिसून येते.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

हैदराबाद-औरंगाबाद विशेष एक्सप्रेस

परभणी-नांदेड-तांडूर

धर्माबाद-मनमाड

नांदेड-मुंबई (तपोवन)

नांदेड-पुणे (साप्ताहिक)

नांदेड-अमृतसर (सचखंड)

नांदेड-पनवेल

नांदेड-बेंगलोर

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार

परभणी जिल्ह्यातील पूर्णा मार्गावरील पिंगळी, मिरखेल, चुडावा, सेलू मार्गावरील पेडगाव, देवलगाव अवचार, ढिंगळी पिंपळगाव व गंगाखेड मार्गावरील पोखर्णी, सिंगणापूर, धोंडी या स्थानकांवर सध्या केवळ एकच रेल्वे दिवसभरात ये-जा करते. यापूर्वी या स्थानकांवर दिवसभरात सात ते आठ पॅसेंजर रेल्वे ये-जा करीत होत्या. सध्या नांदेड विभागात तीनच पॅसेंजर सुरू आहेत. ही संख्या खूप कमी झाली आहे.

विशेष रेल्वेला दिलेले थांबे पूर्वीप्रमाणेच आहेत. केवळ औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर विशेष एक्सप्रेसमध्ये परिवर्तित केल्याने ही रेल्वे छोट्या स्थानकावर सध्या थांबत नाही. उर्वरित रेल्वेचे थांबे जसेच्या तसे आहेत.

- अरविंद इंगोले, स्टेशन प्रबंधक, परभणी.

थांबा नसल्याने आम्हाला होतो त्रास

परभणी जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज भाजीपाला तसेच अन्य साहित्य घेऊन विक्रीसाठी यावे लागते. मात्र, सध्या पिंगळी येथे रेल्वे थांबत नसल्याने या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दिवसभरात या मार्गावर दोन पॅसेंजर धावत आहेत. ही संख्या वाढवावी.

- संदीप थोरात.

मानवत, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील छोट्या गावांना रेल्वे थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. रेल्वेमध्ये तसेच तालुक्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी ये-जा करण्यास रेल्वे नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे.

- रवि वाघमारे.