शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पिकविम्यासह अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी; गोदापात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आंदोलन

- विनायक देसाई पूर्णा ( जि. परभणी) : राज्य सरकारने विमा कंपनीला रक्कम दिलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीने २०२४ खरीप हंगामातील विमा शेतकऱ्यांना दिला नाही. शिवाय अतिवृष्टी अनुदानाचीही प्रतिक्षा आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. 

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे पिक विमा कंपनीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिकविमा अग्रिम मंजूर केली. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले. नुकसान होवून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी पिक विमा अग्रीम व शासनाची मदत शेतकन्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. ती तात्काळ जमा करावी,  नाफेड, सिसिआय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हेटाळणी थांबवावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गादावरी पात्रात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडत नाही तोपर्यंत आंदाेलन सुरूच राहील असा पवित्रा घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, मुंजा  लोढे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, नरसिंग पवार, नामदेव काळे, पंडित भोसले, कैलासराव काळे, विठ्ठल चौकट, रामा दुधाटे, नागेश दुधाटे, लक्ष्मण लांडे, विजय कोल्हे, अंगद काजळे, विष्णु शिंदे आदींनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  रेस्क्यू पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान तहसीलदार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच होता.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी