शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पिकविम्यासह अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी; गोदापात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आंदोलन

- विनायक देसाई पूर्णा ( जि. परभणी) : राज्य सरकारने विमा कंपनीला रक्कम दिलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीने २०२४ खरीप हंगामातील विमा शेतकऱ्यांना दिला नाही. शिवाय अतिवृष्टी अनुदानाचीही प्रतिक्षा आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. 

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे पिक विमा कंपनीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिकविमा अग्रिम मंजूर केली. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले. नुकसान होवून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी पिक विमा अग्रीम व शासनाची मदत शेतकन्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. ती तात्काळ जमा करावी,  नाफेड, सिसिआय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हेटाळणी थांबवावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गादावरी पात्रात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडत नाही तोपर्यंत आंदाेलन सुरूच राहील असा पवित्रा घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, मुंजा  लोढे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, नरसिंग पवार, नामदेव काळे, पंडित भोसले, कैलासराव काळे, विठ्ठल चौकट, रामा दुधाटे, नागेश दुधाटे, लक्ष्मण लांडे, विजय कोल्हे, अंगद काजळे, विष्णु शिंदे आदींनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  रेस्क्यू पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान तहसीलदार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच होता.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी