शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने परभणीकरांची रस्त्यांची चिंता वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:07 IST

रस्ते बांधणीसाठी कंत्राटदारांना बँका कर्ज देण्यास नाखुष असून त्यांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रकल्प रेंगाळण्याची भिती आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, अशी परभणीकरांना चिंता वाटू लागली आहे. 

परभणी :  रस्ते बांधणीसाठी कंत्राटदारांना बँका कर्ज देण्यास नाखुष असून त्यांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रकल्प रेंगाळण्याची भिती आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, अशी परभणीकरांना चिंता वाटू लागली आहे. 

परभणी  येथे १९ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी लोकसभा मतदारसंघातील तब्बल ३ हजार ४४९ कोटी रुपयांच्या रस्ता कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले होते.  यामध्ये पारवा ते असोला ५२२.८० कोटी, कोल्हा ते नसरतपूर २८१.७८ कोटी, वाटूरफाटा ते जिंतूर ५१४.१८ कोटी, जिंतूर ते परभणी ३५६.६६ कोटी, जिंतूर ते औंढा नागनाथ- वसमत-नांदेड २११.३४ कोटी, परभणी ते गंगाखेड २०२ कोटी, पाथरी ते सेलू ते देवगावफाटा २१८ कोटी, राज्य मार्ग २२२ परभणी शहर रस्ता व नाली बांधकाम २६.७६ कोटी, गंगाखेड- पालम-लोहा ६.२९ कोटी या परभणी जिल्ह्यातील रस्त्यासह लोकसभा मतदारसंघातील अन्य रस्ता कामांचा समावेश होता. शिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७१ कोटी ४० लाख रुपयांच्या रस्ता कामाचेही ई-भूमिपूजन यावेळी गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात झालेल्या या भव्य समारंभाचा कार्यक्रम शासकीय असला तरी भाजपाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सभेच्या व्यासपीठावरच आ.मोहन फड यांनी मागणी केल्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी एका झटक्यात गडकरी यांनी मंजूर केला असल्याचे भाषणात सांगितले होते. त्यामुळे विकासापासून कोसोदूर असलेल्या परभणी जिल्हावासियांना रस्त्यांच्या दुरवस्थेचे दारिद्र्य संपेल, अशी आशा वाटली. दळणवळणाची साधने रस्त्यांमुळे नसल्याने मोठे उद्योग परभणीत येत नाहीत. आता खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनीच निधी जाहीर केला म्हटल्यावर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असेही परभणीकरांना वाटू लागले. मंजूर केलेल्या रस्त्यांमधील काही ठिकाणच्या कामांना सुरुवातही झाली आहे; परंतु, मोठ्या रस्त्यांच्या कामांना म्हणावी तशी गती आलेली नाही.

अशातच गडकरी यांनी १९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे एका कार्यक्रमात देशातील रस्ते बांधकामासाठी कंत्राटदारांना कर्ज देण्यास बँकांनी काहीसा अखडता हात घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे, असे सांगितले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील मंजूर केलेले कोट्यवधी रुपयांचे प्रकल्पही रेंगाळतील की काय, अशी भीती परभणीकरांना वाटू लागली आहे. जिल्ह्याील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. शिवाय प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत समजली जाते. विशेषत: परभणी- गंगाखेड, कोल्हा पाटी ते झिरो फाटा, परभणी ते जिंतूर या प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. 

२२२ राष्ट्रीय महामार्गावरील कामांना सुरुवात होईनाराष्ट्रीय महामार्ग २२२ वरील कोल्हा पाटी ते झिरोफाटा या कामास तब्बल २८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. याकामाच्या निविदा काढून ते काम मुंबई येथील कंत्राटदारास सुटले; परंतु, सदरील कंत्राटदाराने हे काम सुरु केलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नांदेड कार्यालयाने या कंत्राटदारास वारंवार नोटिसा दिल्या, तरी कंत्राटदार या कार्यालयास दाद देण्यास तयार नाही. दुसरीकडे या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाहीही देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करु शकत नाही.  त्यामुळे हतबल झालेल्या या कार्यालयाने तुर्त या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणचे खड्डेही बुजविण्यात आले आहेत; परंतु, त्या कामाचा दर्जाही सुमार आहे. त्यामुळे पुन्हा खड्डे पडत आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीparabhaniपरभणीhighwayमहामार्ग