शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात, परीक्षांच्या तारखांचा लागला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून ...

परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. जर वेळेत परीक्षा झाली नाही तर या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने परीक्षेची तारीख जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रशासनात चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या तयारीसाठी खासगी नोकरीला बाजूला ठेवून दोन-तीन वर्षे तयारीत घालविले जातात. मात्र मागच्या दीड वर्षापासून एमपीएससी परीक्षांच्या तारखा वेळोवेळी लांबविला जात आहेत. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत एमपीएससी परीक्षा घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया जात असून, अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न करता अशीच परिस्थिती ठेवणे विद्यार्थी, प्रशासन आणि समाजघटकासाठी अहितकारक आहे. तेव्हा एमपीएससीच्या परीक्षा त्वरित द्याव्यात, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.

यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

मागील वर्षी दोन वेळा एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आला. यावर्षीदेखील अद्याप परीक्षा घेण्यासंदर्भात प्रशासनाकडून तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.

ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?

कोरोना संसर्गामुळे ऑफलाइन शिकवणी वर्ग घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची तयारी अपेक्षेनुसार होत नाही. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी समजदार असतात. सध्या कोरोनाचा संसर्गही कमी झाला आहे. तेव्हा ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट

शाळा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यात मोठा फरक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये समजदारपणा असतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे ठरावीक नियम घालून आणि विद्यार्थी संख्येची मर्यादा ठरवून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. तसेच एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा होत नसल्याने नाउमेद होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- जगदीश कानडे