शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गायरानधारकांसह इतर प्रश्नांवर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST

जिल्ह्यातील गायरान, वनीकरणधारकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, ज्या गायरानधारकांना यापूर्वी सातबारा देण्यात आला आहे, त्यांच्या सातबारातून पोटखराब हा ...

जिल्ह्यातील गायरान, वनीकरणधारकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, ज्या गायरानधारकांना यापूर्वी सातबारा देण्यात आला आहे, त्यांच्या सातबारातून पोटखराब हा शब्द वगळण्यात यावा, प्रत्येक गावात मागासवर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी, ज्या गावात स्वतंत्र स्मशानभूमी आहे, तेथे अतिक्रमण झाले असून, ते हटवावे, पूर्णा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण काढावे, मागासवर्गीय व आदिवासींसाठी आर्थिक तरतुदींचा कायदा करावा, यासह विविध १७ मागण्या या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या.

मानवी हक्क अभियान, भीमप्रहार संघटना आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. भीमप्रहार संघटनेचे संस्थापक प्रा. प्रवीण कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १ वाजता जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद कार्यालय, उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्थानकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केेले. मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, भीमप्रहारचे प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे, विश्वजित वाघमारे, ॲड. विष्णू ढोले, मारोती साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.