शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तपोवन थांबणार नसल्याने मानवतकर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:43 IST

तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मानवत : अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून आता तपोवन एक्सप्रेस ही विशेषरेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील सहा महिन्यांपासून रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपोवन सुरू होणार असलयाने मराठवाड्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी  अपेक्षित स्थानकांवर रेल्वे  थांबणार नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

विशेष तपोवन एक्सप्रेस मुंबई ते हुजूर साहेब नांदेडपर्यंत दररोज धावणार आहे. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा येथे थांबा असल्याचे मध्य रेल्वे विभागाने  परिपत्रक काढून जाहीर केले आहे. या निर्णयाचा फटका मानवत तसेच पाथरी तालुक्यातील रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

या तालुक्यातील प्रवाशांना मुंबई गाठायचे असल्यास सेलू, किंवा परभणी रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडावी लागणार आहे. सेलू रेल्वेस्थानक  मानवत येथून ३१ किमी तर परभणी रेल्वे स्थानक ३२ किमी आहे. या दोन्ही रेल्वेस्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना आर्थिक फटक्यासह  मानसिक तसेच शारीरिक त्रासही सहन करावा लागणार आहे. यामुळे तपोवन एक्सप्रेसला मानवत रोड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी पाथरी आणि मानवत तालुक्यातील नागरिकांनी केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेTapovanतपोवनMarathwadaमराठवाडाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक