शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 20:14 IST

भाजपा सत्तेतून बाहेर होऊ शकते

ठळक मुद्देराजकीय चर्चा सुरु

परभणी : राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३,  काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासपचे ३ व तीन अपक्ष सदस्य आहेत. जि.प.त राष्ट्रवादीची सत्ता असून भाजपा सत्तेत सहभागी झाला आहे. २०१४ मध्ये राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात राज्यस्तरावरुन निधी आणण्यासाठी मदत होईल, या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीने भाजपाला सत्तेत सहभागी करुन घेतले होते. यामागे त्यावेळी काँग्रेसचा विरोधही कारणीभूत होता; परंतु, गेल्या अडीच वर्षात भाजपाचा राष्ट्रवादीला निधी आणण्यासाठी काडीचाही फायदा झाला नाही. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीतील दुरावा कमी झाला आणि या समविचारी पक्षांची मैत्री विधानसभा निवडणुकीपूर्वी घट्ट झाली. सहाजिकच त्याचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये उमटणार आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाशिवआघाडीचे सरकार सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडी तयार होऊ शकते. हे तीन पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३ आणि काँग्रेसचे ६ असे ४३ सदस्यांचे तगडे संख्याबळ जि.प.होईल. त्यामुळे राज्यस्तरावरुन विकासकामांसाठी निधी आणणे सोपे होईल. शिवात सत्तेतील समान कार्यक्रम राबविताना अडचणी येणार नाहीत, अशी  चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. विशेष म्हणजे हे तीन पक्ष एकत्र आल्यास जिल्हा परिषदेत विरोधकच नसल्यागत स्थिती राहणार आहे. विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार भाजपाकडे जावू शकते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, माजी आ.विजय भांबळे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाला आहे.  

शिवसेनेचा एक गटही जिल्हा परिषदेत सत्तेत येऊ इच्छितो. त्या दृष्टीकोनातून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढेही भरविले होते. त्यामुळे महाशिवआघाडीसाठी जि.प.त पोषक वातावरण असल्याची चर्चा आहे. शिवसेना जि.प.तील सत्तेत सहभागी झाल्यास भाजपाला दिलेले सभापतीपद सेनेला मिळू शकते. शिवाय स्थायी समितीतील सदस्य संख्याही सेनेची वाढू शकते. या सर्व शक्यता असल्या तरी ऐनवेळी काही शिवसेना व राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील वाद न मिटल्यास महाशिवआघाडीसाठी अडचणीही येऊ शकतात. अशा वेळी राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेपही या माध्यमातून होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस