शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:29 IST

दहशतवादाचा समुळ नायनाट करण्याचे काम सुरू 

ठळक मुद्दे राहूल गांधी यांच्यावर जोरदार टीका

सेलू :  केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसर्‍यांदा स्थापन होताच  दहशतवाद पुर्णपणे नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बलशाली राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी  सेलू येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. 

महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ पाथरी रस्त्यावरील बोर्डीकर यांच्या मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा गुरुवारी सकाळी अकरा वाजता झाली. यावेळी महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर नगराध्यक्ष विनोद बोराडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, मोदी सरकार येण्यापूर्वी देशात धर्म जात भाषा प्रांत या नावावर देशाला तोडण्याचे काम केले जाते होते. देश कमजोर केला जात होता. त्यामुळे पाकिस्तान सारखा देश भारताला आव्हान उभे करत होता. पंरतू मोदी सरकार परत एकदा केंद्रात येताच दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला जात आहे. जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० हटवणे म्हणजे दहशतवाद कायमचा  नष्ट करण्याचे काम सुरू आहे असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. पाच वर्षांत भाजप सरकारने दहा कोटी शौचालय बांधले. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत शुध्द पिण्याचे पाणी देण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. देशात   कुठलाही भेदभाव न करत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने  कल्याणकारी आणि विकासाच्या विविध  योजना प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार  मेघना बोर्डीकर यांचे भाषण झाले

राहुल गांधी विदेशात पळालेमहाराष्ट्रातील कोल्हापूरला पूर आला तेव्हा राहूल गांधी इटलीत होते. आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू होताच राहूल गांधी विदेशात पळाले अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jintur-acजिंतूरpathri-acपाथरीparabhaniपरभणीyogi adityanathयोगी आदित्यनाथ