शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:01 IST

समृद्ध विकास करण्यासाठी भाजपला सत्तेत आणा

सेलू : शेतकरी, शेतमजूर, युवक व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच मतदार संघाचा समृद्ध विकास करण्यासाठी भाजपाला सत्तेत आणा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़ 

जिंतूर विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथील बोर्डीकर मैदान येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शशिकांत देशपांडे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सुरेश भुमरे, विलास गिते, नगराध्यक्ष विनोद बोराडे, रवींद्र डासाळकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजप हा विकास करणारा पक्ष असून, काही व्यक्तींनी धार्मिक तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ भाजप मात्र विकास याच संकल्पनेवर आधारित असून, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने व राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याने जिंतूर मतदार संघाचे नेतृत्वही भाजपलाच सोपवावे, जेणे करून मतदार संघातील विकासाची प्रलंबित कामे मार्गी लावता येतील, असेही ते म्हणाले़  २०१४ पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर तेराव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून निर्णय घेतल्याने ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगितले. 

सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून विकास कामात अडथळेलोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्यावर काम केले पाहिजे; परंतु, सध्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य व राष्ट्रीय महामार्ग बनविताना अडथळा निर्माण करीत असून, जवळच्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देत आहेत़ अशा लोकप्रतिनिधींना दूर सारले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले़ येणाऱ्या काळात भाजप सरकार मूलभूत विकासावर भर देणार असून, विकासाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे त्यांनी आवाहन केले़ 

मतदारसंघाचा विकास हाच ध्यास-बोर्डीकरयावेळी बोलताना उमेदवार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे़ उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला निर्धार सोडणार नाही आणि सर्वसामान्यांचा विचार असलेले कोणाचेही मन कधीही दुखावणार नाही़ नेहमी विकास कामांच्या जोरावर मिळविलेलं प्रेम टिकवून ठेवून विकासाचेच राजकारण करणार आहे़ त्यामुळे जनतेने साथ द्यावी, असे आवाहन यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर यांनी केले़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jintur-acजिंतूरparabhaniपरभणीyogi adityanathयोगी आदित्यनाथ