शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
'स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
5
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
6
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
7
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
8
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
9
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
10
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
11
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
12
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
13
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
14
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
15
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
16
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
17
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
18
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
19
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
20
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:01 IST

समृद्ध विकास करण्यासाठी भाजपला सत्तेत आणा

सेलू : शेतकरी, शेतमजूर, युवक व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच मतदार संघाचा समृद्ध विकास करण्यासाठी भाजपाला सत्तेत आणा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़ 

जिंतूर विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथील बोर्डीकर मैदान येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शशिकांत देशपांडे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सुरेश भुमरे, विलास गिते, नगराध्यक्ष विनोद बोराडे, रवींद्र डासाळकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजप हा विकास करणारा पक्ष असून, काही व्यक्तींनी धार्मिक तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ भाजप मात्र विकास याच संकल्पनेवर आधारित असून, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने व राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याने जिंतूर मतदार संघाचे नेतृत्वही भाजपलाच सोपवावे, जेणे करून मतदार संघातील विकासाची प्रलंबित कामे मार्गी लावता येतील, असेही ते म्हणाले़  २०१४ पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर तेराव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून निर्णय घेतल्याने ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगितले. 

सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून विकास कामात अडथळेलोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्यावर काम केले पाहिजे; परंतु, सध्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य व राष्ट्रीय महामार्ग बनविताना अडथळा निर्माण करीत असून, जवळच्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देत आहेत़ अशा लोकप्रतिनिधींना दूर सारले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले़ येणाऱ्या काळात भाजप सरकार मूलभूत विकासावर भर देणार असून, विकासाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे त्यांनी आवाहन केले़ 

मतदारसंघाचा विकास हाच ध्यास-बोर्डीकरयावेळी बोलताना उमेदवार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे़ उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला निर्धार सोडणार नाही आणि सर्वसामान्यांचा विचार असलेले कोणाचेही मन कधीही दुखावणार नाही़ नेहमी विकास कामांच्या जोरावर मिळविलेलं प्रेम टिकवून ठेवून विकासाचेच राजकारण करणार आहे़ त्यामुळे जनतेने साथ द्यावी, असे आवाहन यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर यांनी केले़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jintur-acजिंतूरparabhaniपरभणीyogi adityanathयोगी आदित्यनाथ