शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:01 IST

समृद्ध विकास करण्यासाठी भाजपला सत्तेत आणा

सेलू : शेतकरी, शेतमजूर, युवक व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच मतदार संघाचा समृद्ध विकास करण्यासाठी भाजपाला सत्तेत आणा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़ 

जिंतूर विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथील बोर्डीकर मैदान येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शशिकांत देशपांडे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सुरेश भुमरे, विलास गिते, नगराध्यक्ष विनोद बोराडे, रवींद्र डासाळकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजप हा विकास करणारा पक्ष असून, काही व्यक्तींनी धार्मिक तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ भाजप मात्र विकास याच संकल्पनेवर आधारित असून, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने व राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याने जिंतूर मतदार संघाचे नेतृत्वही भाजपलाच सोपवावे, जेणे करून मतदार संघातील विकासाची प्रलंबित कामे मार्गी लावता येतील, असेही ते म्हणाले़  २०१४ पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर तेराव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून निर्णय घेतल्याने ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगितले. 

सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून विकास कामात अडथळेलोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्यावर काम केले पाहिजे; परंतु, सध्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य व राष्ट्रीय महामार्ग बनविताना अडथळा निर्माण करीत असून, जवळच्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देत आहेत़ अशा लोकप्रतिनिधींना दूर सारले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले़ येणाऱ्या काळात भाजप सरकार मूलभूत विकासावर भर देणार असून, विकासाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे त्यांनी आवाहन केले़ 

मतदारसंघाचा विकास हाच ध्यास-बोर्डीकरयावेळी बोलताना उमेदवार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे़ उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला निर्धार सोडणार नाही आणि सर्वसामान्यांचा विचार असलेले कोणाचेही मन कधीही दुखावणार नाही़ नेहमी विकास कामांच्या जोरावर मिळविलेलं प्रेम टिकवून ठेवून विकासाचेच राजकारण करणार आहे़ त्यामुळे जनतेने साथ द्यावी, असे आवाहन यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर यांनी केले़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jintur-acजिंतूरparabhaniपरभणीyogi adityanathयोगी आदित्यनाथ