शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली; आदित्य ठाकरेंचा सरकारवर आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:47 IST

शेतकऱ्यांना कजमाफीचे प्रमाणपत्रे दिली जात आहेत़ परंतु, संबंधित शेतकऱ्यांचे कर्जच माफ केले जात नाही

परभणी : राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी आतापर्यत आपणास भेटला नसल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील एका कार्यक्रमात बोलताना केला़ 

शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या भूमीपूजन समारंभाचे व दुष्काळ निवारण संकल्प शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांशी संबंध नसलेल्या कंपन्यांना सरकारने पीक विम्याचे काम दिले आहे. या खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फारसा लाभ दिला नाही़ ज्यांना पीक विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या याद्या आमदार आणि खासदार यांच्याकडे द्या, शिवसेना त्याचा जाब विचारून या प्रश्नावर आंदोलन करेल, असे सांगत त्यांनी राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी किती शेतकऱ्यांना झाली, असा सवाल केला़ त्यावर उपस्थितीत शेतकऱ्यांनी कोणालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले़. शेतकऱ्यांना कजमाफीचे प्रमाणपत्रे दिली जात आहेत़ परंतु, संबंधित शेतकऱ्यांचे कर्जच माफ केले जात नाही अशी टीकाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली .

यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव,आ़ जयप्रकाश मुंदडा , जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, सोपान आवचार, नंदू पाटील, समप्रिया पाटील, सदाशिव देशमुख, अंबिका डहाळे, सखूबाई लटपटे, गजानन काकडे, ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदींची उपस्थिती होती. 

सौर उर्जेवर चालणारी एकमेव सुतगिरणी-पाटीलयावेळी बोलताना आ़ डॉ़ राहुल पाटील म्हणाले की, जय भवानी महिला सहकारी सुतगिरणी ही १०० टक्के सौर उर्जेवर चालणार असून, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सुतगिरणी ठरणार आहे़ या सुतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे.  १०० टक्के समाजकारण याच भूमिकेतून शिवसेनेने आतापर्यंत काम केले असून, त्यासाठीच ही दुष्काळी संकल्प शिबीर आयोजित करण्यात आले आहे़ त्यामुळे  दुष्काळात शेतकऱ्यांनी खचून न जाता व आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता कुटूंबाचा विचार करून संकटांचा सामना करावा, शिवसेना त्यांच्यासोबत आहे़, असे सांगून त्यांनी शिवसेनेची बांधिलकी शेतकरी व सर्वसामान्यांशी आहे़ पोलीस भरतीसाठी शिवसेनेने १०० युवकांना दत्तक घेतले असून, मेगा भरतीसाठी युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही शिवसेनेकडून सुरू आहे़ गतवर्षीच आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात १ लाख लोकांची तपासणी करण्यात आली़ त्यातील १० हजार जणांवर मुंबईत विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या, असे ते म्हणाले़

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरी