शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न विधानसभेत मांडणार; राहुल पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:42 IST

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.

परभणी : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी येथे दिली.

रिलायन्स पीक विमा कंपनी, जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकारी आणि जिल्हाधिधकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकांचे नुकसान झाले असतानाही विमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. जिल्हाभरातील या शेतकऱ्यांनी २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. 

या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, आ. डॉ. राहुल पाटील यांनी शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. पीक विम्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले.

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र पीक विम्याच्या गंभीर प्रश्नावर शेकडो शेतकरी पेरण्यांची कामे सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत, हे विशेष.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीCrop Insuranceपीक विमा