शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
4
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
5
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
6
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
7
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
8
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
9
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
10
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
11
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
12
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
13
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
14
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
15
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
16
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
17
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
18
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
19
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
20
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:07 IST

पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

- विठ्ठल भिसेपाथरी: चारी क्र 49 मधून पाणी सोडण्याची मागणी करत तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज दुपारी वरखेड येथील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असल्याने शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना दोन पाणी आवर्तन मंजूर करण्यात आले आहेत. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले होते. तर दुसरे आवर्तन आठ दिवसापासून सोडण्यात आले आहे. असे असले तरी हदगाव बु येथील चारी क्रमांक 49 ला  अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. या चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.  कालवा निरीक्षक यांनी पाणी सोडतो पाणीपट्टी भरून घ्या , म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली. मात्र, जायकवाडीचे पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. यातच खताचा डोस दिल्याने पिके करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

यामुळे आज सकाळी आठ वाजेपासून वरखेड जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालया शेजारील डाव्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत चारी क्रमांक 49 ला पाणी सोडले जात नाही तोपर्यंत बाहेर येणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. दरम्यान, उप विभागीय अभियंता पवार घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.

पूर्णक्षमतेने पाणी सोडावेपैठणच्या जायकवाडी धरणा मधून रब्बी हंगामासाठी पाण्याचे दुसरे आणि शेवटचे आवर्तन सोडले गेलेले असून बी 59 वितरेकेला पूर्ण क्षमतेने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे .रब्बीतील उशिरा  पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची आवश्यक असताना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टेल पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही .त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी बी 59 चारीमध्ये सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र