शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

'पाणी सोडा, पिके करपत आहेत'; शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या कालव्यात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:07 IST

पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

- विठ्ठल भिसेपाथरी: चारी क्र 49 मधून पाणी सोडण्याची मागणी करत तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज दुपारी वरखेड येथील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असल्याने शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याबाहेर येणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला केला.

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना दोन पाणी आवर्तन मंजूर करण्यात आले आहेत. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले होते. तर दुसरे आवर्तन आठ दिवसापासून सोडण्यात आले आहे. असे असले तरी हदगाव बु येथील चारी क्रमांक 49 ला  अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. या चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.  कालवा निरीक्षक यांनी पाणी सोडतो पाणीपट्टी भरून घ्या , म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली. मात्र, जायकवाडीचे पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. यातच खताचा डोस दिल्याने पिके करपत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

यामुळे आज सकाळी आठ वाजेपासून वरखेड जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालया शेजारील डाव्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत चारी क्रमांक 49 ला पाणी सोडले जात नाही तोपर्यंत बाहेर येणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. दरम्यान, उप विभागीय अभियंता पवार घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.

पूर्णक्षमतेने पाणी सोडावेपैठणच्या जायकवाडी धरणा मधून रब्बी हंगामासाठी पाण्याचे दुसरे आणि शेवटचे आवर्तन सोडले गेलेले असून बी 59 वितरेकेला पूर्ण क्षमतेने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे .रब्बीतील उशिरा  पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची आवश्यक असताना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टेल पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही .त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी बी 59 चारीमध्ये सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र