शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

पाथरी तालुक्यातील 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके मोजतायेत अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:59 PM

पावसाने मारलेली दडी, उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके धोक्याच्या पातळीवर गेली आहेत

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ) : गेल्या दोन तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाने मारलेली दडी, उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके धोक्याच्या पातळीवर गेली आहेत. लांबलेल्या पावसाने तब्बल 37 हजार 497 एकर वरील सोयाबीन पीक माना टाकू लागले आहे. तसेच 45 हजार 805 एकर क्षेत्रावरील कापूस पिकावर रोगराई चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके सलाईनवर असून 40 हजार हेक्टर क्षेत्राखालील खरीप पीक धोक्यात आली आहेत. तालुक्यात एकूण सारसरीच्या केवळ 52 टक्के तीन महिन्यात पाऊस पडला आहे, येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर संपूर्ण हंगाम हातचा जाण्याचा मार्गावर आहे. 

पाथरी तालुका हा गोदावरी नदी आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पट्ट्यात येतो. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्या तरी या भागात बारमाही शेतीसाठी सिंचन होत नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसावरच अवलंबून असतात, पर्यायाने बागायती क्षेत्र ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.  तालुक्यात खरीप हंगामात 46 हजार 710 हेक्टर क्षेत्र आहे, त्यात प्रत्यक्ष पेरा 40 हजार 810 हेक्टर आहे, गत वर्षी कपाशीचे क्षेत्र 23 हजार 500 हेक्टर होते ,बोन्ड अळीने या वर्षी क्षेत्रात घट झाली ,प्रत्येक्ष पेरा 18 हजार हेक्टर वर आला, तर तुरीचे क्षेत्र 3हजार 986 हेक्टर आहे,त्याच बरोबर मुगाचा पेरा 2 हजार105 एकर एवढा आहे. 

गेली अनेक वर्षापासून या भागात खरिपाच्या 60 टक्के क्षेत्रात कापूसाची लागवड केली जात असे, बोटी कापसाच्या वणावर ही मोठया प्रमाणावर बोन्ड अळी आणि रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कापसाच्या घटलेल्या उत्पनाने या भागातील शेतीचे पुर्णतः अर्थकारण बिघडून गेले आहे. पारंपरिक पद्धतीने कापूस पीक बेभरवशाचे बनले गेले आहे, कापूस लागवडीसाठी आणि संगोपन साठी लागणार खर्च आणि उत्पनाची तफावत या मुळे मागील काही वर्षात सोयाबीन चा पेरा ही वाढला आहे. कापसावर रोगांचा प्रादुर्भाव आणि अल्प काळात निघणाऱ्या सोयाबीन ला पाऊसच झटका या मुळे खरीप हंगामातील दोन्ही प्रमुख पिके बेभरवशाची झाली आहेत.

या तालुक्यात बाभळगाव मंडळ वगळता इतर भागात सुरुवातीला चांगला पाऊस पडला खरा मात्र त्या नंतर पावसाने मधल्या काळात खंड दिला. सोयाबीन येन फुलात असताना पाऊस लांबला, त्याचा फटका बसला.ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या आठवड्यात पाऊस पडला, त्या नंतर मात्र गेल्या 15 ते 20 दिवसा पासून पावसाने दडी मारली आहे. सध्या सोयाबीन ला शेंगा लागल्या आहेत, शेंगा भरण्या ची वेळ असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहे, कापूस पिकावर महागडी औषधी फवारणी करून ही रोगराई कमी होत नाही, त्या मुळे खरीप हंगामातील पिके आता शेवटची घटका मोजत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

सरासरी 52 टक्के पाऊसपाथरी तालुक्याचे सरासरी पावसाचे प्रजन्यमान 768.50 मिमी एवढे आहे, जून ते ऑगस्ट याकाळात सरासरी 511.34 मी मी पाऊस पडतो , मात्र या वर्षी या काळात म्हणजे च 3 महिन्यात सरासरी 400.83 मिमी पाऊस पडला म्हणजेच तीन महिन्यांच्या काळात फक्त 52 टक्के पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर संपूर्ण हंगाम हातचा जाण्याचा मार्गावर आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती