शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 15:05 IST

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत.

- राजन मंगरूळकर

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागांतर्गत वाहतूक सुरू असलेल्या रेल्वेमार्गांपैकी सद्य:स्थितीत केवळ २ टप्प्यांची वाहतूक दुहेरीकरणाद्वारे सुरू आहे. याच विभागातील ८२० कि.मी.च्या रेल्वे मार्गापैकी सध्या ७३७ किलोमीटरच्या मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. नांदेड विभागाच्या २०१८-१९ मधील लाइन कपॅसिटी युटिलायझेशनच्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे. त्यात मागील ३ वर्षांत फारसा बदल झालेला नाही, हेही विशेष.

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सर्व मार्गांचे ब्रॉडगेज पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ २ सेक्शनमधील वाहतूक दुहेरीकरण मार्गाने सुरू आहे. उर्वरित सात सेक्शनमधील ७३७ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणताही नवा मार्ग किंवा दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या तरी प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेला नाही. या मार्गांवर सुरू असलेल्या प्रवासी, मालवाहतुकीद्वारे मार्गावर किती वाहतूक आहे, त्याची टक्केवारी किती, याचा अहवाल २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

दुहेरीकरणामुळे वाहतूक वाढल्याचे होते सिद्धसात टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या किलोमीटरसाठी दाखविण्यात आलेल्या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी-अधिक असून, या मार्गांचा विचार दुहेरीकरणाच्या बाबतीत केला जात नसल्याचे दिसून येते. दुहेरीकरण केल्याने २ टप्प्यांतील वाहतूक ११० ते १२० टक्के सुरू असल्याचे आकडेवारी सांगते, तर बाकी ठिकाणाहून असलेली अधिकची प्रवासी संख्या आणि उत्पन्न याचा विचार करून तेथील सरासरी ८० टक्के वाहतुकीला दुहेरीकरणातून का डावलले जात आहे.

८३ कि.मी.वर १२० टक्के वाहतुकीचा भारपरभणी-पूर्णा २९ कि.मी. व पूर्णा-मुदखेड ५३ कि.मी. अशा एकूण ८३ कि.मी.च्या मार्गावर ११० ते १२० टक्के वाहतुकीचा भार आहे, तर त्यावर धावणाऱ्या रेल्वेचे एका दिवसाचे प्रमाण २६.५ एवढे आहे, तर उर्वरित ७ टप्प्यांतील एकेरी मार्गावर ८० टक्के सरासरी वाहतुकीचा भार असून, तेथे सरासरी १५ ते १८ रेल्वे दिवसाला धावतात, असे अहवाल सांगतो. विशेष म्हणजे, विभागातील सर्व रेल्वे नांदेडहून सुटतात. त्या दक्षिण भारत, उत्तर भारत यासह अन्य भागांत परभणी, जालना, परळी, औरंगाबाद, मनमाडमार्गेच जातात. मग परभणीच्या पुढे वाहतूक कमी का होते, या मार्गाचे दुहेरीकरण केल्यास येथील मार्गावरही वाहतूक वाढण्यास मदत होऊ शकते.

सेक्शन             कि.मी.चा मार्ग रेल्वेचे प्रमाण             लाइनवरील वाहतुकीचे प्रमाण (टक्केवारी)

मनमाड-औरंगाबाद ११३             १८.७                         ८५औरंगाबाद-जालना ६२             १७.७                         ८०जालना-परभणी             ११५             १७                         ७६परभणी-पूर्णा             २९             २५.६                         ११६परभणी-परळी             ६४             १२                         ५५पूर्णा-मुदखेड             ५३             २६.५                         १२०मुदखेड-आदिलाबाद १६२             ६.५                         ४१आदिलाबाद-पिंपळकुटी २१             २                         १३पूर्णा-अकोला             २१० १०.१                         ४६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादparabhaniपरभणीrailwayरेल्वेNandedनांदेड