शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 15:05 IST

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत.

- राजन मंगरूळकर

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागांतर्गत वाहतूक सुरू असलेल्या रेल्वेमार्गांपैकी सद्य:स्थितीत केवळ २ टप्प्यांची वाहतूक दुहेरीकरणाद्वारे सुरू आहे. याच विभागातील ८२० कि.मी.च्या रेल्वे मार्गापैकी सध्या ७३७ किलोमीटरच्या मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. नांदेड विभागाच्या २०१८-१९ मधील लाइन कपॅसिटी युटिलायझेशनच्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे. त्यात मागील ३ वर्षांत फारसा बदल झालेला नाही, हेही विशेष.

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सर्व मार्गांचे ब्रॉडगेज पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ २ सेक्शनमधील वाहतूक दुहेरीकरण मार्गाने सुरू आहे. उर्वरित सात सेक्शनमधील ७३७ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणताही नवा मार्ग किंवा दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या तरी प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेला नाही. या मार्गांवर सुरू असलेल्या प्रवासी, मालवाहतुकीद्वारे मार्गावर किती वाहतूक आहे, त्याची टक्केवारी किती, याचा अहवाल २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

दुहेरीकरणामुळे वाहतूक वाढल्याचे होते सिद्धसात टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या किलोमीटरसाठी दाखविण्यात आलेल्या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी-अधिक असून, या मार्गांचा विचार दुहेरीकरणाच्या बाबतीत केला जात नसल्याचे दिसून येते. दुहेरीकरण केल्याने २ टप्प्यांतील वाहतूक ११० ते १२० टक्के सुरू असल्याचे आकडेवारी सांगते, तर बाकी ठिकाणाहून असलेली अधिकची प्रवासी संख्या आणि उत्पन्न याचा विचार करून तेथील सरासरी ८० टक्के वाहतुकीला दुहेरीकरणातून का डावलले जात आहे.

८३ कि.मी.वर १२० टक्के वाहतुकीचा भारपरभणी-पूर्णा २९ कि.मी. व पूर्णा-मुदखेड ५३ कि.मी. अशा एकूण ८३ कि.मी.च्या मार्गावर ११० ते १२० टक्के वाहतुकीचा भार आहे, तर त्यावर धावणाऱ्या रेल्वेचे एका दिवसाचे प्रमाण २६.५ एवढे आहे, तर उर्वरित ७ टप्प्यांतील एकेरी मार्गावर ८० टक्के सरासरी वाहतुकीचा भार असून, तेथे सरासरी १५ ते १८ रेल्वे दिवसाला धावतात, असे अहवाल सांगतो. विशेष म्हणजे, विभागातील सर्व रेल्वे नांदेडहून सुटतात. त्या दक्षिण भारत, उत्तर भारत यासह अन्य भागांत परभणी, जालना, परळी, औरंगाबाद, मनमाडमार्गेच जातात. मग परभणीच्या पुढे वाहतूक कमी का होते, या मार्गाचे दुहेरीकरण केल्यास येथील मार्गावरही वाहतूक वाढण्यास मदत होऊ शकते.

सेक्शन             कि.मी.चा मार्ग रेल्वेचे प्रमाण             लाइनवरील वाहतुकीचे प्रमाण (टक्केवारी)

मनमाड-औरंगाबाद ११३             १८.७                         ८५औरंगाबाद-जालना ६२             १७.७                         ८०जालना-परभणी             ११५             १७                         ७६परभणी-पूर्णा             २९             २५.६                         ११६परभणी-परळी             ६४             १२                         ५५पूर्णा-मुदखेड             ५३             २६.५                         १२०मुदखेड-आदिलाबाद १६२             ६.५                         ४१आदिलाबाद-पिंपळकुटी २१             २                         १३पूर्णा-अकोला             २१० १०.१                         ४६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादparabhaniपरभणीrailwayरेल्वेNandedनांदेड