शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

परभणीत बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांच्या मदतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 20:11 IST

शासनाने १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला होता. ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकर्‍यांना १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांच्या मदतीची गरज आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होतानुसार शासनाने १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परभणी:  कृषी विभागाने जिल्ह्यामध्ये केलेल्या पंचनाम्यानुसार २ लाख ३३ हजार २४ हेक्टरवरील कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकर्‍यांना १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांच्या मदतीची गरज आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार शासनाने १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. बोंडअळीने शेतकरी अडचणीत सापडला. या शेतकर्‍यांना मदत देण्यात यावी, यासाठी अनेक संघटनांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार कृषी विभाग, महसूल व जिल्हा प्रशासन या तीन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करावेत, असे आदेश काढण्यात आले. त्यानुसार काही दिवसांत पंचनामेही पूर्ण झाले. या पंचनाम्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकर्‍यांनी २ लाख ३३ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केल्याचे आढळून आले. लागवड केलेल्या कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला चढविल्याने सर्वच पिकाचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकर्‍यांना १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांच्या मदतीची गरज आहे, असा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार जिल्ह्याला मदत मिळणे अपेक्षित होते. 

या पार्श्वभुमीवर महसूल व वन विभागाच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी दि.रा.बागणे यांच्या स्वाक्षरीनिशी नवा आदेश काढण्यात आला. त्यात खरीप २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी व तुडतुडे किडीच्या प्रादूर्भावामुळे बाधित शेतकर्‍यांना मदत देण्याबाबत नमूद करण्यात आले; परंतु, या आदेशामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी कापूस पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशाच मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या कापूस उत्पादक शेतकर्‍यातून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता. 

या सर्व कापूस उत्पादकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ मार्च २०१८ रोजी सु.ह.उमराणीकर यांच्या स्वाक्षरीनिशी नवीन आदेश काढला. या आदेशामध्ये जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना बोंडअळीची मदत देण्यात येणार आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडे तीन लाख शेतकर्‍यांना १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

६ हजार ८०० रुपये प्रमाणे मिळणार मदतखरीप हंगामात लागवड केलेल्या कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला चढविल्यामुळे शेतकरी हाताश झाला होता. कापूस पिकावर केलेला खर्चही शेतकर्‍यांना उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला. मात्र शासनाच्या घोषणेनुसार जिल्ह्यातील कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी शासनाच्या निर्णयानुसार ६ हजार ८०० रुपये या प्रमाणे मदत मिळणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पेरणी आधी मदत देण्याची मागणीयावर्षीचा खरीप हंगाम अवकाळी पाऊस व बोंडअळीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे २०१८-१९ या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना पेरणी करण्यासाठी लागणारे बी-बियाणे, औषधी, खते खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यात येणारी मदत खरीप हंगामाच्या पेरणीआधी देण्यात यावी, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकर्‍यांमधून होत आहे. 

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणीFarmerशेतकरीMONEYपैसाcollectorतहसीलदार