शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

संचारबंदी डावलून नागरिकांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

परभणी : वाढीव संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी आदेश डावलत शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार केला. जिल्ह्यातील बाजारपेठ मात्र आठव्या दिवशीही बंद ...

परभणी : वाढीव संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी आदेश डावलत शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार केला. जिल्ह्यातील बाजारपेठ मात्र आठव्या दिवशीही बंद राहिल्याने या कागदोपत्री संचारबंदीविषयी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात जागोजागी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च ते १ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच बुधवारी नव्याने आदेश काढून पुन्हा १ ते ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली. विविध पक्ष, संघटना, व्यापारी आणि नागरिकांचा या संचारबंदीला विरोध असतानाही प्रशासनाने मात्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे या संचारबंदीची कडक अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा होती. गुरुवारी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कोणतीही विचारपूस झाली नाही किंवा गर्दी हटविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दिवसभर नागरिकांचा शहरात मुक्त वावर पहावयास मिळाला. त्‍यामुळे संचारबंदीऐवजी दुकान बंदीचा अनुभव गुरुवारी देखील आला.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. जिल्ह्यात दररोज साधारणतः ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. मागील आठ दिवसांपासून ही उलाढाल ठप्प आहे. मागील वर्षीच्या कोरोनामुळे आधीच आर्थिक संकट उभे ठाकले असताना दुसरीकडे संचारबंदीने बाजारपेठ बंद राहिल्याने या आर्थिक नुकसानीत आणखी भर पडली आहे.