शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

संचारबंदीत पाच दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST

दुकाने बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय परभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून ...

दुकाने बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

परभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी संचारबंदी हा पर्याय नाही, असे मत व्यक्त करीत अनेकांनी संचारबंदीला विरोध केला आहे. २४ मार्च रोजी संचारबंदी लागू केल्यानंतर, याविरुद्ध सेलू, परभणी येथे व्यापाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क करून दुकाने सुरू ठेवण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी ही मागणी मान्य न करत, संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मागच्या सात दिवसांपासून जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ही संचारबंदी संपणार असल्याने प्रशासन आता पुढे काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातच बुधवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एक आदेश काढून जिल्ह्याच्या संचारबंदीत ५ एप्रिलपर्यंतची वाढ केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, संचारबंदी कालावधीत वाढ करणे आवश्यक आहे, असे नमूद करीत संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. या काळात ज्या अस्थापना, अत्यावश्यक बाबींना सूट दिली आहे, त्यांना सूट राहील. त्याचप्रमाणे, ज्या अस्थापना, दुकानांना सूट नाही, त्या अस्थापना आणि दुकाने बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.

काटेकोर अंमलबजावणीची गरज

मागील संचारबंदीच्या काळात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. बाजारपेठेतील दुकाने बंद आणि शहरात नागरिकांचा मुक्त संचार, असे चित्र दिसून येत होते. त्यामुळे ही संचारबंदी म्हणजे दुकानबंदी असल्याचेच चित्र सातही दिवस दिसून आले. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.