शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभरा पेरा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:17 IST

यावर्षीच्या रब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा झाला आहे.

ठळक मुद्देरब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरा झाला आहे

परभणी : यावर्षीच्या रब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा वाढल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

यावर्षी खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी या पावासाचा फटका बसला असला तरी शेतकºयांकडे असलेल्या विहीर, नदी, नाले, बोअर यांना सध्या मूबलक पाणीसाठा आहे. या उपलब्ध पाण्याचा विचार करुन येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी ९ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. तसेच गव्हासाठी ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २१ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. करडईसाठी २५ हजार २०९ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी केवळ २ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे.

विशेष म्हणजे यावर्षी मागील पाच वर्षाचा अनुभव पाहून कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने हरभरा पिकासाठी ५३ हजार ६४ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु, यावर्षी शेतक-यांनी कृषी विभागाचा अंदाज फोल ठरवला आहे. कारण जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी काढणीच्या वेळी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतक-यांनी ज्वारी पिकाच्या पे-याकडे दुर्लक्ष करीत पाच वर्षात सर्वाधिक ७९ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर हरभ-याचा पेरा केला आहे.  

ज्वारीची पेरणी केवळ ५७ टक्क्यांवरज्वारी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्याकडे पाहिले जाते. त्यानुसार येथील कृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते. मात्र रब्बी हंगाम अर्धा संपत आला तरीही केवळ ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करायावर्षी रब्बी हंगामात हरभ-याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे अळीच्या बंदोबस्तासाठी सर्तक राहून शेतक-यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. हरभरा पिकात १० ते १५ लाकडी पक्षी थांबे उभारावेत, जेणेकरुन हे पक्षी अळ्या वेचून खातील व नैसर्गिक पद्धतीने अळ्यांचा बंदोबस्त होईल. तसेच एकरी दोन ते तीन कामगंध सापळे उभारावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. सुखदेव, तंत्र अधिकारी डी.व्ही.नागुरे, क्रॉप सॅपचे कीड नियंत्रक आर.के. सय्यद यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी