शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभरा पेरा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:17 IST

यावर्षीच्या रब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा झाला आहे.

ठळक मुद्देरब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरा झाला आहे

परभणी : यावर्षीच्या रब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच हरभरण्याचा पेरा वाढल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

यावर्षी खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी या पावासाचा फटका बसला असला तरी शेतकºयांकडे असलेल्या विहीर, नदी, नाले, बोअर यांना सध्या मूबलक पाणीसाठा आहे. या उपलब्ध पाण्याचा विचार करुन येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी ९ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. तसेच गव्हासाठी ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २१ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. करडईसाठी २५ हजार २०९ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यापैकी केवळ २ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे.

विशेष म्हणजे यावर्षी मागील पाच वर्षाचा अनुभव पाहून कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने हरभरा पिकासाठी ५३ हजार ६४ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु, यावर्षी शेतक-यांनी कृषी विभागाचा अंदाज फोल ठरवला आहे. कारण जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या ज्वारीसाठी काढणीच्या वेळी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतक-यांनी ज्वारी पिकाच्या पे-याकडे दुर्लक्ष करीत पाच वर्षात सर्वाधिक ७९ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर हरभ-याचा पेरा केला आहे.  

ज्वारीची पेरणी केवळ ५७ टक्क्यांवरज्वारी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्याकडे पाहिले जाते. त्यानुसार येथील कृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते. मात्र रब्बी हंगाम अर्धा संपत आला तरीही केवळ ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करायावर्षी रब्बी हंगामात हरभ-याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे अळीच्या बंदोबस्तासाठी सर्तक राहून शेतक-यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. हरभरा पिकात १० ते १५ लाकडी पक्षी थांबे उभारावेत, जेणेकरुन हे पक्षी अळ्या वेचून खातील व नैसर्गिक पद्धतीने अळ्यांचा बंदोबस्त होईल. तसेच एकरी दोन ते तीन कामगंध सापळे उभारावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. सुखदेव, तंत्र अधिकारी डी.व्ही.नागुरे, क्रॉप सॅपचे कीड नियंत्रक आर.के. सय्यद यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी