शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

वडिलांनी स्मार्ट फोनचा हट्ट पुरवला नाही; युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 2:24 PM

या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात.

देवगावफाटा : वडिल मोबाईल घेऊन देत नसल्याचा राग मनात धरुन एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सेलू तालुक्यातील निरवाडी खु. तांडा येथील २७ एप्रिल घडली होती. या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

निरवाडी खु. तांडा येथील कृष्णा गोविंदराव आडे (२०) या युवकाने २७ एप्रिल रोजी चिकलठाणा खु. येथील सखाराम टाके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. निरवाडी खु. तांडा येथील गोविंदराव आडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. 

मुलीचे लग्न करुन दिल्याने गोविंदराव आडे यांची आर्थिक अडचण सुरु होती. त्यांना शेतीकामात मदत करणारा मुलगा कृष्णा आडे याने आत्महत्या केल्यापासून तर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ६ मे रोजी वालूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव चौरे यांनी कृष्णा याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे जवाब नोंदवून घेतले. यावेळी त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी सांगितले, अ‍ॅन्ड्रॉँईड मोबाईल घेऊन देण्याची मागणी कृष्णाने वारंवार केली होती. परिस्थितीमुळे त्याला मोबाईल घेऊन देणे शक्य नसल्याने थोडेसे थांबण्याची विनंती केली. मात्र कृष्णाचा हट्ट जीवावर बेतेल, असे वाटले नव्हते. मोबाईल न दिल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्येचा पर्याय निवडला, असा जवाब त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी पोलिसांना दिला आहे.आई- वडिल हे मुलांच्या सुखासाठी सर्वकाही करीत असतात. मात्र मुलांच्या मनाविरुद्ध पालकांनी वागू नये, असा आजचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे मुलांचे अनावश्यक हट्ट असतील तर पालकांनी याबाबत अगोदरच मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. जेणेकरुन  मुलाने हा हट्ट सोडून दिला पाहिजे.- साहेबराव चौरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 

टॅग्स :Suicideआत्महत्याMobileमोबाइलparabhaniपरभणी