शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

गोरगरीब नागरिकांची जेवणासाठी आबाळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठरावीक कोट्यापर्यंत ...

गोरगरीब नागरिकांची जेवणासाठी आबाळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठरावीक कोट्यापर्यंत मोफत भोजन दिले जाते. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेऊन शासनाने शिवभोजन थाळीचा कोटा वाढविला आहे. मात्र, तरीही दररोज येथील शिवभोजन थाळी केंद्रावरून सरासरी १५ ते २० जण उपाशीपोटीच परत जात आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या भोजनाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

२५ जण उपाशीपोटी परतले

बसस्थानक केंद्र : येथील केंद्रावर दररोज असलेल्या कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी शिवभोजनासाठी येतात. मात्र, कोटा संपल्याने दररोज १० ते २० जण परत जातात. रविवारीदेखील कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी केंद्रात दाखल झाले होते.

नवा मोंढा केंद्र : येथील केंद्रावर रविवारी ४१५ जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. मात्र, कोटा कमी पडत असल्याने दररोज १५ ते २० लाभार्थी परत जातात. सुटीच्या दिवशी ही संख्या अधिक असते. त्यामुळे अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते.

रोज २५ हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात दररोज सुमारे २५ हजार नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळतो.

जिल्हाभरात दररोज ८ ते १० हजार नागरिक उपाशी राहतात, त्यांचे काय?