शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:23 IST

मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

- मारोती जुंबडेपरभणी: यंदा सप्टेंबर महिन्यात ढगफुटी, जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची शासकीय मदत दिली जावी. यासाठी जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी शासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.

यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक तुटवडा जाणवतो आहे. तरीही शासनाने शेतकऱ्यांसाठी फक्त हेक्टरी ८,५०० रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे, जी अत्यंत अपुरी ठरते. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. शेतकऱ्यांनी तीन हेक्टरपर्यंत अनुदानाची मर्यादा वाढवावी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील तीन बंद ट्रिगर सुरू करावेत, रासायनिक खते, बियाणे व औषधींचे भाव कमी करावेत अशा मागण्या केल्या. हा मोर्चा जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकातून सुरू झाला आणि जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकऱ्यांचा रूमनं मोर्चा...पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई मिळावी, तसेच चार ट्रिगर या योजनेत समाविष्ट करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत रस्त्यावरील खानापूर फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रूमनं मोर्चा काढला. हा मोर्चा वसमत रस्त्यावरील खानापूर फाटा परिसरातून सुरू झाला आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता सर्व प्रकारच्या कर्जाची संपूर्ण माफी, एम.एस.पी. पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांची एम.एस.पी. नुसार आठ दिवसांत खरेदी सुरू करावी, तसेच ऊस उत्पादकांच्या प्रति टन १५–२० रुपये कपातीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी केली. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हेमचंद्र शिंदे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, विश्वंभर गोरवे, मुंजा प्रसाद गरुड, नागेश दुधाटे, हनुमान आमले, विठ्ठल चौकट, किशन शिंदे, पंडित भोसले, माऊली शिंदे, नामदेव काळे, विकास भोपाळे आणि पि.टी. निर्वळ यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Farmers Protest: Demand ₹50,000/Hectare Aid After Crop Loss.

Web Summary : Parbhani farmers protested, demanding ₹50,000/hectare compensation for crop damage due to heavy rains. They criticized insufficient government aid and urged increased subsidy limits. Swabhimani Shetkari Sanghatana also protested, seeking fair crop prices and loan waivers.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र